भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 8, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 8

उत्तरेमध्ये सुलतानशाही तेराव्या शतकाच्या प्रारंभी प्रस्थापित झाली असली तरी दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता. इ. स. १२९५ मध्ये दिल्लीचा सुलातान जलालउद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव करून रामदेवरावास आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपला चुलता जलालउद्दीन याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकाविली. खिलजीच्या स्वारीमुळे दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला. इ. स. १३१७ मध्ये मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला. या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली त्यानंतर काही वर्षांतच म्हणजे इ. स. १३२४ मध्ये दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. महंमद तघलकाच्या काळात दक्षिणेतील मथुरेपर्यंतचा भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला. परंतु तघलकांचे वर्चस्व दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही. इ.स. १३४७ मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट होता. एकसंधी बहमनी राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकून राहिले. याकाळात दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने (इ.स. १३३६ ते १५६५) बहामनीशी झुंज देऊन आपली संस्कृती संपन्न स्थानिक सत्ता टिकवून धरली परंतु महाराष्ट्रात मात्र बहामनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते. प्राचीन वैभव कोसळून गेले होते. चैतन्य आटून गेले होते. बहामनींची राजकीय पकड फार घट्ट असल्यामुळे स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नगण्य स्थान होते. अशा परिस्थितीत इ.स. १४९० च्या सुमारास एकसंधी बहमनी राज्याला तडा गेला आणि त्याची पाच शकले झाली. पाच स्वतंत्र शाही राजवटी प्रस्थापित झाल्या. निजामशाही (अहमदनगर), आदिलशाही (विजापूर), कुतुबशाही (गोवळकोंडा), बरीदशाही (बिदर) आणि इमादशाही (वऱ्हाड). दक्षिणेत एकसंधी बहमनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारूकी घराण्याची स्वतंत्र राजवट होती. ही राजवट इ.स. १६०१ पर्यंत म्हणजे मुगलांचा दक्षिण भारतात प्रवेश होईपर्यंत टिकून राहिली. बहमनी राज्याचे विभाजन होऊन ज्या पाच शाही राजवटी निर्माण झाल्या त्यांचे आपापसात सतत संघर्ष चालू होते. ह्या संघर्षात इमादशाही हे राज्य नष्ट होऊन गेले. दक्षिण भारतात शाही राजवटींचे हे संघर्ष चालू असतानाच उत्तर भारतामध्ये इ.स. १५२६ मध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा म्हणजे लोदी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर २ छत्रपती शिवाजी महाराज