भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 9, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 9

प्रस्थापित केली, दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. त्याच सुमारास पोर्तुगीजांनी इ.स. १५१० मध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली, पोर्तुगीजांनंतर पुढे डच्च, इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्याकडून परवाने मिळवून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी वखारी घातल्या. आणि काही बंदरांवर घट्ट पकड निर्माण केली. अशाप्रकारे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल व पोर्तुगीज या सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. इ. स. १५६५ मध्ये आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली. दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालीकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली. या घटनेनंतर शाही राजवटीतील आपापसातील संघर्ष पुन्हा उफाळून आले. दरम्यान उत्तर भारतामध्ये मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते. सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राजवटींपुढे आव्हान निर्माण केले. अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इ.स. १६३६ मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतूबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढ्य राजसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या. सामाजिक परिस्थिती एकसंधी बहमनी साम्राज्याच्या कालखंडात (इ.स.१३४७ ते १४९०) दक्षिणेतील, विशेषतः महाराष्ट्रातील समाजजीवन तेजोहीन बनले होते. क्षात्रवृत्तीच्या मराठ्यांना बहमनी राजवटीत कोणतेही राजकीय स्थान मिळू शकले नाही. फारसी भाषा ही राजदरबारी भाषा असल्यामुळे व्यवहारामध्ये तिचा उपयोग सुरू झाला. फारसीबरोबर दखनी, हिंदी व उर्दू भाषेचे महत्त्व वाढले. शिक्षणव्यवस्था नसल्यामुळे सर्वसामान्य समाज निरक्षर राहिला या समाजामध्ये 'अज्ञान वाढले. अंधश्रद्धा वाढल्या. बहमनी राजवटीतील लोकांच्या धर्मश्रद्धा अत्यंत चिवट होत्या. चातुर्वर्ण्य, जाती, उपजाती यांचे प्राबल्य सर्व समाजावर होते. जातीयव्यवस्थेमुळे शिवपूर्वकाल ३