भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 15, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 15

एकवीस घरी असलेली विठ्ठलभक्तीची परंपरा व ज्ञानेश्वर, नामदेव यांची प्रेरणा यातून तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंगवाणी स्रवू लागली. साक्षात्काराच्या आधी, नामदेवाच्या प्रेरणेच्या आधी, सद्गुरूच्या उपदेशाआधी, त्यांनी थोडेफार कवित्व केले असावे. पण आता जे परतत्त्वाच्या स्पर्शाने पुनीत झालेले 'वाङ्मय' त्यांच्या मुखातून बाहेर येऊ लागले, त्याच्या तेजाने, त्याच्या रसकत्तेने, त्याच्या मार्मिकतेने, सर्वजण त्यावेळीही दिपून गेले. तुकोबांच्या कवित्वाचा एक महत्त्वाचा विशेष असा की, त्यांचा आत्मविश्वास मोठा असला तरी, आपले कवित्व ही ईश्वराची देणगी आहे, अशी यथार्थ जाणीव त्यांना होती. इतकेच नव्हे तर, तो देवच आपल्या मुखातून बोलतो, अशी त्यांची खात्री होती. आपण केवळ भारवाही आहोत, धन्याचा माल वाटणारे आहोत, निरोप आहोत, प्रत्यक्ष बोलणारा अथवा बोलविणारा तो भगवंत आहे, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. 'माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो । काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तैंचि वदे ।', 'नव्हती माझे बोल बोले पांडुरंग', 'आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची । साळुंकी मजुल बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची', 'तुका म्हणे मज बोलवितो देव', इत्यादी ओळींतून तुकाराम बुवांनी आपल्या वाणीच्या प्रसादाचे व तेजाचे मर्म विशद केले आहे. पारमार्थिक अनुभवांचे सार तुकाराम महाराजांनी एकूण अभंग किती लिहिले ? म्हणजे त्यांच्या मुखातून किती स्रवले ? त्यांचे लेखन कुणी केले, कोणत्या प्रसंगी कोणते अभंग तयार झाले, विशेष प्रसंगाचे अभंग कोणते ? इतर तुकारामांचे 'तुका म्हणे' या मुद्रेने देहूच्या तुकारामाच्या गाथेत शिरलेले कोणते ? त्यांच्या अभंगातील क्रमविकास कोणता ? स्फुट अभंगांचे गट किंवा समूह प्रथमपासूनच होते काय ? पुढे ज्या ओळींना किंवा वर्गीकरणांना महत्त्व आले, त्यांना तुकोबांच्या हयातीत कितपत आधार होता ? इत्यादी अनेक प्रश्नांची चर्चा संशोधकांनी व अभ्यासकांनी आजपर्यंत केलेली आहे. सर्वसाधारणपणे साडेचार ते पाचहजार पर्यंत अभंग तुकाराम महाराजांचे म्हणून उपलब्ध आहेत असे मानले, तर त्यांचे सक्षेपारने दर्शन घेता येण्यासारखे आहे. स्थूल मानाने तुकारामबुवांच्या अभंगांचे दोन प्रकार पडतात. पहिल्या विभागात त्यांना आलेले वैराग्य, त्यांची साधना, त्यांच्या मनाची तळमळ, त्यांच्या जीवाची झालेली लटपट, त्यांनी केलेली ईश्वराची, विठ्ठलाची करुण शब्दांतील प्रार्थना, त्यांचे देवावरचे रुसणे, त्यांचा प्रेमकलह, त्यांचा देवापाशी लडिवाळ हट्ट, त्यांचे एरयेरीवर येणे, इत्यादी साधनेच्या किंवा साक्षात्काराच्या पूर्वावस्थेतील विविध अनुभवांचे चित्तवेधक व करुणेने ओतप्रोत भरलेले अभंग सर्वांनाच मोलाचे वाटतील असे आहेत. यानंतर तुकारामांना ईश्वर भेटला, त्यांचा अभंगसंग जडला, जीवाशिवांचे आलिंगन झाले, शरीरसंबंधाची मिठी जडली, सगुण विठ्ठलाचे हृदयंगम दर्शन झाले, त्यांच्या प्रेमाने व जवळकीने आयुष्य धन्य झाले. मनातील सर्व संशय फिटले, मन शांत झाले, तन्मयता व तल्लीनतेचा उल्हास निर्माण झाला, ईश्वराच्या सहवासात निरनिराळ्या प्रकारचे अनुभव येत राहिले, यासंबंधीचीही वर्णने अतिशय सखोल, भावपूर्ण व वाचकाचे चित्त उल्हसित करणारी आहेत. तुकोबांच्या या आत्मानुभूतीपर अभंगांतच त्यांच्या पारमार्थिक अनुभवांचे सारसर्वस्व साठविले आहे. सामाजिक उद्बोधन अभंगाच्या दुसऱ्या विभागात तुकाराम महाराज ज्या संसारापासून दूर झाले, त्या संसार- इतरांचा अधिक उन्नत स्वरूपाचा व्हावा म्हणून, समाजाकडे वळून त्यांनी अतिशय करून पथात दोषांवर बोट ठेवून टीका करण्यास प्रारंभ केला. भोळ्याभाबड्या लोकांना दंभाच्या, धर्माच्या नावा- खाली फसवणारे साधुसंत व ढोगी बुवा निर्माण झाले होते. नाना दैवते निर्माण करून वेड्यापायाडया

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 15, कुल 611 में से · BharatKosha