भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 341, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 341

टाक. माझ्याशी एक दोन शब्दांनी बोल ना. माझा स्वीकार तुजकडून होत नाही, असे दिसताच मी त्याचाही विचार करीन. २ कोणी याचक यजमानाजवळ काही मागावयास गेला तर यजमानाने दान देऊन त्याचा मान राखला पाहिजे व याचकानेही जे मिळेल ते घेतले पाहिजे. दोघांनीही एकमेकांचा मान राखला पाहिजे. अशी ही धर्मनीती आहे. जर दान मिळाले नाही तर दोघांनाही दोष प्राप्त होतो. ३ म्हणून तर देवा, मी तुझी इच्छा करून आहे. तुझ्या वचनाची वाट पाहात आहे. मोठ्या सायासाने मी तुझ्याबद्दल धीर धरून उभा आहे. वाट पाहण्याच्या नेमास मी काही कधी चुकणार नाही. ४ तुझे वचन घेतल्याशिवाय मी येथून हलणारच नाही. हाच माझा खराखुरा नेम आहे असे तू जाण. ५ ६२५ आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण निघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥ १ ॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझें लाधले पाय । आतां मज न विसंबे माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥ २ ॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहेरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥ ३ ॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारसृष्टी । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥ ४ ॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सायासीं-खटपटीत, लाधतो-मिळतात. अर्थ :- देवा, आता मी इतर कुठल्या साधनमार्गांच्या खटपटीत पडणार नाही संसारदुःखांच्या पाशातही अडकणार नाही. मी आता संतांना शरण जाऊन तुझ्या पायाशी स्थान मिळवीन. ते त्यांना मागेन. १ माझे काय संचित कर्म होते, हे काही कळत नाही. कोणत्या पुण्याईने तुझे पाय लाभतील ? आई, आता तू मला विसरू नकोस ग. मी तुला अतिशय शोकाकुल होऊन विनवीत आहे. २ या संसारात मला फारच त्रास झाला. मोहमाया यांच्या ज्वालानी व विषारी गंधाने माझी फार विटंबना केली. सत्त्व, रज, तम या गुणाच्या तीव्र लहरी मनात निर्माण होऊन मी दुःखाने फारच गांजून गेलो आहे देवा. ३ आणखी मी माझे किती दुःख सांगावे तुला? या संसारदुःखांची मर्मकहाणी ऐकताना पाषाणसुद्धा दुभंगतील. माझ्या तर चित्तात भयाने कांपरेच भरलेले आहे ४ आता हे दुःख मला मुळीच सहन होत नाही. या संसाराची दुर्गंधी आता मला व्यथित करीत आहे. या दुखभाराने मी चांगला जाणता असून वेडाच बनून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला पाव व माझे रक्षण कर. ५ ६२६ आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळों अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥ १ ॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहींच नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक ऊणें रंकाहूनी ॥ २ ॥ मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धावतां नावरती । सकळ पुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळों नाहीं ॥ ३ ॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥ ४ ॥