भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 42, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 42

१६ सार्थ तुकारामगाथा अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर १ तूप पथ्या ॥ ५ ॥ दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पडे सुपती ॥ ६ ॥ नीज नये घाली फुलें । जवळी न साहती मुलें ॥ ७ ॥ अंगी चंदन लाविते भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ ८ ॥ हाड गळोनि आले मांस । माझें दुःख तुम्हां नेणवें कैसें ॥ ९ ॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥ १० ॥

शब्दार्थ व टीपा :- चोळंब - ढोंग, कौतुक, रागाव, गोहा - नवऱ्याला, मारिला - नादावलेला, भिडा - भिडेने, निपट - अगदी, न चले - पचत नाही, जात नाही, साजा - वेळेस, गेलेवारी - मागल्या वारी, बाजाराच्या दिवशी, सातदी - सात दिवसात, व्यथा - दुख, लहरी - चक्कर, भोवड, घेरी, सुपती - झोपी जाते, जिता - जिवंतपणीच

अर्थ - एक सुखात वाढलेली स्त्री आपल्या पतीला आपल्या नाजूक प्रकृतीचे ढोंग किंवा कौतुक वर्णन करून सांगत आहे आणि म्हणते, 'अहो, माझे दुःख कुणीच कसे जाणीत नाही?' १ आणि बायकोच्या प्रेमाने नादावलेला वेडा नवरा भिडेखातर 'होय य हो खरेंच' असे म्हणत राहतो २ त्याची बायको त्याला म्हणत असते, 'मला अन्न मुळीच जात नाही, पचत नाही. दिवसास तीन वेळास कसे तरी पायलीभर गहू पुरतात मला ३ गेल्या बाजाराच्या दिवशीच तुम्ही साखर आणलीत, पण ती साडेदहा शेर साखर मला कशी तरी सात दिवस पुरली ४ मला एकसारखे पोटाचे दुखणे आहे, म्हणून दूधभात व तूपसाखर याच्या पथ्यावर मला राहावे लागते ५ दोन प्रहरी मला चक्कर येत असल्यामुळे मी अंथरुणावर पडून झोपी जाते, कधी बेशुद्धही होते. ६ मला कधी धड झोपही येत नाही, मग मी माझ्या अंथरुणावर फुलांचा थर घालते जवळ सारखी किरकिर करणारी मुले मला सहन होत नाहीत. ७ माझे कपाळ नेहमीच दुखत असल्यामुळे मी कपाळावर, अंगावर चंदनाची उटी लावते ८ माझी सारी हाडे गळून गेली असून नुसते मांस उरले आहे, हे माझे दुःख तुम्हास कसे समजत नाही ? ९ तुकाराम महाराज म्हणतात, या असल्या ढोंगी बायकोच्या नादाने नवरा जिवंत असतानाच शुद्ध गाढव बनला व मेल्यावर नरकात गेला त्याला नीट प्रपंचही समजला नाहीं; परमार्थही साधला नाही १०

निरूपण :- तुकारामबुवांच्या अभंगातून भव्य असे तत्त्वनिरूपण वा कथाप्रसंगाचे, वृत्तान्ताचे कथन नसले तरी त्यांच्या अभंगांचे स्थूल मानाने दोन वर्ग करता येतात पहिल्या वर्गात त्यांची स्वतःची मनःस्थिती त्यांनी सविस्तर वर्णन केली आहे आपला उद्योगधंदा, आपला संसार, आपले वैराग्य, आपली साधना, आपणास झालेली गुरुप्राप्ती, आपली कवित्वशक्ती, परमेश्वरभेटीची तीव्र लालसा, तळमळ, उत्कंठा, ईश्वराचे रूपचितन, त्याच्या भेटीचा परमानंद, पुनः विरह, पुनः तगमग, पुनः दर्शनाचे सुख, मीलनाचा आनंद हा सर्व विलास पहिल्या प्रकारच्या अभंगातून बुवानी सविस्तर वर्णन केलेला आहे दुसऱ्या प्रकारच्या अभंगातून बुवा समकालीन लोकांना प्रपंच व परमार्थ याच्यासंबंधी उपदेश करीत आहेत ढोंगी, स्वार्थी गुरूंच्या मागे लागून लोक कसे फसत आहेत व त्यांचे ना धड परमार्थ ना धड प्रपंच, अशा अवस्थेत दिवस कसे वाया जात आहेत याचे चित्रण त्यांनी अनेक अभंगातून केले आहे लोकांचे वैयक्तिक प्रपंच कसे चुकीच्या मार्गाने होत आहेत याचीही चित्रे त्यांनी रेखाटली आहेत लोकही ढोंगी आहेत केवळ पैसा, केवळ स्त्री, केवळ मानसन्मान, केवळ स्वार्थ याच्याच नादी लागून परमार्थविचार अगदीच सोडून देत आहेत असे बुवाना दिसले ईश्वराचे नावही न घेता लोक निव्वळ प्रपंच प्रपंच, पैसा पैसा करीत आयुष्य कंठतात अशा भेसूर प्रपंचाची बुवानी फार मार्मिक व बोलकी शब्दचित्रे काढलेली आहेत प्रत्यक्ष उपदेशापेक्षाही असल्या उपरोधिक टीकेमुळे लोकांना जास्त समजते असा अनुभव सर्वत्र आहे

या अभंगात अशाच एका अर्थकामाधिष्ठित जोडप्याचे प्रपंचिक चित्र बुवानी उपरोधाने रंगविले आहे या अभंगातील बाई सुखाला, विलासाला चटावलेली आहे साऱ्यांनी, विशेषतः आपल्या नवऱ्याने सदैव आपलेच

१ साकर पथ्या