भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 50, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 50

२४ सार्थ तुकारामगाथा करू शकतो ' सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाहीं बहुमता ' असा स्पष्ट निर्वाळा बुवानी दिलेला आहे एकान्तात आपल्या मनासच साक्षी ठेवून वागता येते सर्वसामान्य लोकांचे बहुमत उपयोगी नसते या आत्मज्ञानी भक्ताच्या निवासाचे व एकान्तप्रियतेचे वर्णन ज्ञानेश्वरांनी फार बहारीने केले आहे ' आणि तीर्थे धौतें तटें । तपोवनें चोखटें । आवडती कपाटें । बसवू जया ॥ शैलकक्षांचीं कुहरें । जलाशय परिसरें । अधिष्ठी जो आदरें नगरा नये । बहु एकान्तावरी प्रीति । जया जनपदाची खती । जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो " साधुसंत वा आत्मज्ञानी याप्रमाणे एकांतवासात प्रभूशी समरस झाले असले तरी ते सुख इतरेजना देप्यासाठी ते लोकाच्यातही मिसळत असतात हेही येथे ध्यानात घ्यावयास हवे ' आपण जेवुनी जेववी लोका । सतपंण करी तुका ' म्हणून बुवानी आपल्या कार्याचे मर्म मागितल आहे लोकाच्या उद्धारासाठी जेव्हा सत पुरुष समुदायात येतात तेव्हाही त्याच एकान्ताचे ममत्व कायम असत ५० हिरा ठेविता ऐरणीं । वाचे मारिता जो घणीं ॥ १ ॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ २ ॥ मोहरा होय तोचि अगिं । सूत न जळे ज्याचे सगिं ॥ ३ ॥ तुका म्हणे तोचि सत । सोसी जगाचे आघात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - करणी-कृत्रिम मणी काच इ० मोहरा-ज्याच्या संगतीत आगीतही सूत जळत नाही अस रत्न अर्थ - जो हिरा एरणीवर हातोडयाचे आघात सहन करूनही फुटत नाही तोच खरा १ त्यालाच खरे मोल असते कृत्रिम काचेसारखा असेल तर त्याचा लागलीच चुराच होतो २ ज्याच्या संगतीत अग्नीच्या मुखातही सूत जळत नाही तोच खरा मोहरा मणी म्हणायचा ३ जो जगाचे आघात सहन करील तोच खरा सत म्हणावा असे तुकाराम महाराज म्हणतात ४ विवरण -सताच्या चरित्राच व वर्तणुकीचे महत्त्व समकालीन लोकांना बहुधा वेळीच उमगत नसत संत फटकळपणे समाजाच्या, व्यक्तीच्या गैरवर्तनावर बोट ठेवून कधी कटु शब्दात कधी मृदु शब्दात जाणीव देत असतात सर्व काळास उपयुक्त होईल असा त्याचा उपदेश असतो स्वतः अतिशय निर्लोभी मानापमानाच्या पलीकड गेलेले असे त असतात याच्या या वृत्तीमुळे ढोंगी स्वार्थी, लोभी माणसांची अडचण होते मग ते संताचा द्वेष करायला प्रवृत्त होतात ज्ञानेश्वर एकनाथ, तुकाराम इत्यादी सत्पुरुषांचा झालेला छळ प्रसिद्ध आहच स्वतः संताना याचं काही नसत लाव रागावले तरी सुत पुरुष शांत असतात ' विश्व रागें झालिया वन्ही । संते सुखें व्हावे पाणी ' अशी त्याची शिकवण असते जगाचे आघात संतांना सहन करावे लागतात ५१ आलिंगने घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥ १ ॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ २ ॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । त्याची केली पाये सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सायुज्यता-मुक्तीचा एक प्रकार सीमा-अखर पायापें-पायाशी अर्थ - संताच्या आलिंगनाने सायुज्यतेची मुक्ती मिळते १ संतांचा महिमा हा असा आहे त्याविषयी बोलणेही अपुरे पडते सायुज्यता मिळाल्यानंतर दुसरे काय साध्ययचे २ सर्व तीर्थे व सर्व पर्वकाळ संताच्या पद्याशीच असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, संताची सेवा केली की तो देवास पोचते ४ विवरण -या अभंगात संत महिमा वर्णन केला आहे संताच्या सहवासात सर्व तीर्थे सब पुण्ये प्राप्त होतात अशी ग्वाही सबच संतानी दिलेली आहे या सताच्या पायी नामदेव-तुकारामानी आपला जीव काढून ठेविला होता ' संतमहंत माझी पूजा । आन भाव नाहीं दुजा । अशी निष्ठा स्वतः तुकोबाची होती संताच्या पादुका सायावर

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 50, कुल 611 में से · BharatKosha