भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 523, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 523

सार्थ तुकारामगाथा ४७९ हल्ला करील, तोच त्याचा पराभवही करू शकेल त्यालाच जय मिळेल ४ तुकाराम महाराज म्हणतात, या शूरत्वाच्या गोष्टी नुसत्या बोलायच्या नसतात, तर मोठा निश्चय करून कार्यसिद्धी करणे हेच सेवेकऱ्याच्या सेवेचे सार्थक आहे ५ १०७२ जातीचा पाईक ओळखले पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥ १ ॥ धरितील पोटासाठीं हतियेरें । फळती तों खरें वेठोचींसों ॥ २ ॥ जातीचे ते असे खरें घायदाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥ ३ ॥ तुका म्हणे नमूं देव म्हण जन । जालियाच्या खुणा जाणतसो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जातीचा-श्रेष्ठ प्रकारचा, खरा, खरें-गाढवे, वेठीचींसों-विगारीची, घायदाय-रीत, डावपेच, पारखिया-पारस करणाऱ्या लोकांपाशी अर्थ - जो खरा जातवंत सेवक असतो, तोच दुसऱ्या सेवकास ओळखतो त्यासच त्याच्या कार्याविषयी आदर वाटतो १ व जे केवळ पोटासाठीच हातात हत्यारे धरून असतात, ती माणसे केवळ बिगारीच्या गाड्या- प्रमाणेच नुसती हेतुशून्य होऊन राबतात असे समजावे २ जे जातीने खरे शूरवीर पुरुष आहेत, त्याचे डावपेच जो पारखी असतो, त्याच्या दृष्टीतून सुटत नाहीत त्यास त्याची ओळख पटतेच ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र देवाचीच वस्ती आहे, असे समजून आम्ही या सेवकास वंदन करूच, पण जे खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेलेले आहेत, त्यांच्याही खुणा आम्ही जाणतोच ४ विवरण - तुकाराम महाराजांचे हे पाईकाचे अकरा अभंग अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहेत. परमेश्वर- प्राप्तीच्या मार्गात अथवा भक्तिसाधनेत पाईकाच्या गुणाची कितीतरी आवश्यकता आहे आपले सर्व गुणसर्वस्व आपल्या धन्यासाठी, स्वामीसाठी खर्च करण्याची प्रतिज्ञा या सेवकाने घेतलेली असते अशी ही निकराची भावना भक्तीच्या वृत्तीस पोषकच आहे तुकाराम महाराजांच्या या विशेष अभंगाचा अर्थ दोन्ही प्रकारांनी लावता येण्या- सारखा आहे शिवबा व त्याचे स्वराज्यसाधनाचे कार्य व त्यासाठी तळहातावर शीर घेऊन निघालेले वीर सेवक, याच्या धैर्याचे व काहींच्या कुचराईचे वर्णन बुवांनी केले आहे हे सर्व वर्णन परमार्थाच्या मार्गावर निघालेल्या विठ्ठलाच्या वीर पुरुषानाही यथार्थपणे लागू पडते समोरील बाणाचा, तोफेच्या गोळ्याचा वर्षाव छाती पुढे करून झेलणे, शत्रूच्या चोरवाटा शोधणे, आपले शरीर गवताप्रमाणे क्षुल्लक मानणे, सुवर्ण दगडाप्रमाणे मानून वागणे, आपल्या गुणवत्तेने पाईकाचे सेवकाचा नाईक होणे, थोर प्रकारची सेवा, हेच खरे वतन मानणे, पाठीवर शत्रूचे घाव घेऊन पळून न येणे, सर्व धैर्य एकवटून शत्रूवर तुटून हल्ला करणे, ही सर्व खऱ्या पाईकाची लक्षणे तुकारामबुवांनी दिली आहेत ती पाहून यावेळी त्याच्या भोवती खरोखरच शिवबाचे शूरवीर शिपाई त्याची कथा ऐकण्यासाठी तत्पर झालेले असावेत असे वाटते तुकोबानी त्यांनाही स्वदेशकार्यासाठी उत्तेजित केले व आपल्या भक्तांनाही परमार्थमार्गात पाईकपणाचे महत्त्व काय आहे हे विशद करून सांगितले किंवा असेही असेल की, प्रत्येकाने जस परमार्थमार्गात निपुण असावे, तसच देशकार्याचीही त्यास जाणीव असावी हे दोन्ही मार्ग परस्पर दिसतात, तेवढे भिन्न नाहीत केवळ भक्तीमार्गी लोकांना व केवळ देशवीरांना उद्देशून प्रत्येकाच्या वर्गास उपयोगी पडेल असा उपदेश या अभंगात आहे, असे म्हणण्यापेक्षा सरमिसळ करून प्रत्येक माणसाने या दोनही अंगाचे महत्त्व समजावे अशीही कल्पना बुवाच्या मनात असेल ईश्वरप्राप्ती हेच जीविताचे ध्येय तुकारामादी साधुसंतानी मानले होते, हे खरे असले तरी त्याचे लक्ष भोवती असावे असे वाटून त्याचे परमार्थज्ञान एवढे संकुचित मानण्याचे काही कारण नाही त्याच्या आत्मज्ञानात सर्व विश्वाचा सामावेश होतो व त्यामुळे पीडलेल्या प्रजेच्या पारमार्थिक अराजकाने ते जसे कळवळून गेले, तसेच त्याचे ऐहिक दुर्दैवही त्याना पाहावले नाही दोघाची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यानी केला

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 523, कुल 611 में से · BharatKosha