भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 125, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 125

भाषा झाकाळून गेली होती. भाषेचे शुद्धीकरण करण्यासाठी रघुनाथ पंडिताकडून 'राज्यव्यवहारकोश' महाराजांनी तयार करवून घेतला. राज्याभिषेकापासून नवीन कालगणना सुरू केली. व्याकरण, ज्योतिष या विषयावरील ग्रंथ लिहून घेतले. जातीजातीमधील तंटेबखेडे दूर करण्यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केलेले आढळतात. ब्राह्मण आणि प्रभू या दोन उच्च जातींमध्ये वर्षानुवर्षे कलह चाललेला होता. शिवाजी महाराजांनी गागाभट्टाच्या सहाय्याने तो कलह दूर केला आणि या दोन्ही जातीत सामंजस्य निर्माण केले. गुलामगिरीची प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा महाराजांनी प्रयत्न केलेले आढळतात. न्याय व्यवस्था न्यायव्यवस्थेबाबत शिवाजी महाराजांनी पंचायतपद्धतीच्या न्यायव्यवस्थेला प्राधान्य दिलेले आढळते. पंचायतपद्धती ही परंपरागत न्यायपद्धती होती. रूढीपरंपरेप्रमाणे चालत आलेले कायदे आणि प्रत्येक जातीनिहाय रूढ असलेले कायदे यांचा विचार करून गावपंचायत न्यायदान करीत असे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दगाबाजी करणे किंवा शत्रुपक्षाला जाऊन मिळणे यांची चौकशी करण्याचे काम सुभेदाराकडे किंवा देशाधिकाऱ्याकडे असे शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळाकडे न्यायाधीश हा एक प्रधान होता. स्वराज्यातील न्यायदानाची जबाबदारी न्यायाधीश या प्रधानावर असे. अत्यंत महत्त्वाचे खटले प्रत्यक्ष महाराजांसमोर चालत असत. गोतसभेचे काही निवाडे महाराजांच्या उपस्थितीत झालेले आढळतात. धर्मविषयक खटले पंडीतराव या प्रधानापुढे चालत असत. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील ब्रह्मवृंद त्या त्या भागातील धर्मविषयक न्यायनिवाडे करीत असत. नैतिक गुन्ह्याविषयी स्वतः महाराज अत्यंत संवेदनशील होते. स्वराज्याची स्थापन केली त्या सुमारास एका गावच्या पाटलाने व्याभिचार केल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याचा एक हात व एक पाय तोडून महाराजांनी कडक शिक्षा केली होती. स्वराज्याशी बेइमान होणाऱ्या अधिकाऱ्यांना ते कडक शासन करीत असत. अफजलप्रकरणी खंडोजी खोपडे या देशमुखाचे हातपाय तोडून त्यांनी बेइमानीचे फळ दिले होते. स्वराज्यातील स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी शत्रुपक्षातील स्त्रियांना आणि मुलांना जर कोणी पकडून आणले तर त्यांनाही महाराज शिक्षा करीत असत आणि साडी चोळीचा सन्मान देऊन स्त्रियांना परत पाठवीत असत. खाफीखान लिहितो की, 'शत्रू पक्षाकडील स्त्री सैनिकांनी पकडून आणली तर त्या स्त्रीचा सन्मान करून महाराज तिला तिच्या नातलगांकडे पाठवून देत असत. शिवरायाच्या कार्याचे स्वरूप ११९

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास) · पृष्ठ 125, कुल 127 में से · BharatKosha