भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 19, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 19

वतीने रणदुल्लाखानाने मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पराभव झाला. अशाप्रकारे कुतूबशहा व आदिलशहा यांना नामोहरम करून शहाजहानने आपला मोहरा शहाजीकडे वळविला. ६ मे १६३६ रोजी शहाजहान व आदिलशहा यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण तह झाला. हा तह दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. या तहातील २ कलमे महत्त्वाची असून एका कलमाप्रमाणे आदिलशहा हा शहाजहानचा मांडलीक झाला. दुसऱ्या कलमाप्रमाणे निजामशाही खालसा करून ते राज्य मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घ्यावे असे ठरले. या तहामुळे शहाजीला आदिलशहाचा असलेला आधार तुटला. निजामशाही वाचविण्यासाठी आता दोन बलाढ्य शत्रूशी आपल्याला सामना द्यावा लागेल याची शहाजीला जाणीव झाली. ज्या रणदुल्लाखानाने शहाजीला मदत केली त्यालाच आदिलशहाने शहाजीविरुद्ध पाठविले. शहाजहानने खान झमान यास शहाजीविरुद्ध चालून जाण्यास सांगितले. अशा बिकट परिस्थितीतही निकराची झुंज देण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू केला. गनिमीकाव्याने लढण्यासाठी त्याने डोंगराळ प्रदेशाची निवड केली. प्रथम त्याने सिंहगड व राजगड या किल्ल्यांचा आश्रय घेतला. रणदुल्लाखान आणि खान झमान पाठलागावर होतेच. तेव्हा शहाजीने कोकणात उतरून माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. मुघलांनी माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला. शहाजीने शर्थीची झुंज सुरू केली. परंतु निजामशाहीच्या वारसाच्या-मूर्तजाच्या-आईने शहाजहानशी तहाची बोलणी लावल्यामुळे अखेर शहाजीला शरण जाणे भाग पडले. ऑक्टोबर १६३६ मध्ये शहाजहानने माहुलीचा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला आणि आदिलशहाची चाकरी पत्करून तो कर्नाटकाकडे निघून गेला. या घटनेबरोबर निजामशाहीचाही अंत झाला. शहाजीचे कार्य कर्नाटकाकडे जाण्यापूर्वी शहाजीने आपल्या पुणे जहागिरीची व्यवस्था लावली. दादाजी कोंडदेव यास कारभारी नेमले. जिजाबाई व बालशिवाजी यांना पुणे जहागिरीतच ठेवले. आदिलशहाने कर्नाटकातील छोट्या मोठ्या हिंदू राजवटींवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची कामगिरी शहाजीवर सोपविली होती. शहाजीने या लहान मोठ्या राजवटींवर आपले वर्चस्व निर्माण केले, त्यांच्याकडून खंडण्या वसुल केल्या. परंतु एकही राज्य खालसा केले नाही त्यामुळे महंमद आदिलशहास शहाजीचा वारंवार संशय येत होता. शिवभारतकाराने असे म्हटले शहाजीची कामगिरी १३