भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 36, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 36

बोलणी सुरू केली. शिवाजीच्या अपेक्षेप्रमाणे वेढ्याला काहीशी शिथिलता प्राप्त झाली. ते पावसाळ्याचे दिवस होते. आषाढ महिन्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे तर वेढ्याला अधिकच शिथिलता आली. या संधीचा फायदा घेऊन पन्हाळ्याहून निसटून जाण्याचे शिवाजीने ठरविले. आषाढ वद्य प्रतिपदा शके १५८२ म्हणजे १२ जुलै १६६० रोजी गुरुवारी मध्यरात्री निवडक लोकांसह गस्तवाल्यांची नजर चुकवत शिवाजीने पन्हाळ्याहून सुटका करून घेतली. काळीकुट्ट रात्र, वादळी हवा, विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस अशा या निसर्गाच्या रौद्र तांडवाला तोंड देत आडवाटेने शिवाजी राजेंनी विशालगडाकडे कूच केली. काही वेळाने शिवाजी गडावरून निसटल्याचे सिद्दी जौहरच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब सिद्दी मसऊद यांना मोठी फौज देऊन शिवाजीच्या पाठलागावर पाठविले. पन्हाळा ते विशालगड हे अंतर ४० मैलांचे होते. जवळजवळ ३५ मैल अंतर कापून शिवाजी गजापूरच्या खिंडीपर्यंत पोहचला. अद्याप ५-६ मैल अंतर तोडावयाचे होते. तेवढ्यात सिद्दी मसऊदच्या फौजेची चाहूल लागली. प्रसंग मोठा बाका होता. अशा या अवघड प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे याने शिवाजीला निर्धास्तपणे विशालगडाकडे जाण्यास सांगितले आणि निवडक लोकांनिशी गजापूरखिंडीत सिद्दी मसऊदचे सैन्य रोखून धरण्याचा निर्णय घेतला. शिवाजी निवडक लोकांनिशी मोठ्या गतीने विशालगडाकडे निघाला. पण विशालगडाच्या पायथ्याशी आणखी एक मोठे संकट शिवाजीपुढे उभे राहिले. आदिलशहातर्फे जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे या दोन मराठे सरदारांनी विशालगडला अगोदरच वेढा घालून ठेवला होता. या दोन्ही मराठा सरदारांबरोबर शिवाजीने निकराचे युद्ध केले. तिकडे बाजीप्रभूने पराक्रमाची शिकस्त करून गजापूरची खिंड रोखून धरली. त्याच्या समवेत बांदल देशमुखाचे निधड्या छातीचे सैन्य होते. ९१ कलमी बखरीत म्हटल्याप्रमाणे, प्रहर दीडप्रहर हे युद्ध चालले याचा अर्थ शिवाजी विशालगडावर पोहचेपर्यंत बाजी प्रभू शर्थीने लढत राहिला. त्याला अनेक जखमा झाल्या. एक घाव मर्मी लागून तो कोसळला. त्याचवेळी गडावर पोहचल्याची खूण म्हणून शिवाजीने इशारतीचे आवाज केले. राजे गडावर पोहोचले या आनंदात बाजीप्रभूने प्राण सोडले. सिद्दी मसऊद गजापूर खिंड ओलांडून विशालगडावर पोहोचला. परंतु गड अवघड असल्यामुळे आणि मराठ्यांनी निकराने विरोध केल्याने त्याला हताश होऊन परत जावे लागले. विशालगडाहून नंतर शिवाजीने राजगडाकडे ३० छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास) · पृष्ठ 36, कुल 127 में से · BharatKosha