भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 86, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 86

११. कर्नाटक स्वारी शिवाजीने ६ जून १६७४ रोजी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि आपण स्वतंत्र सार्वभौम राजे आहोत असे त्यांनी निःसंदिग्धपणे जाहिर केले. महाराजांच्या या कृतीचा मुघलांना राग येणे स्वाभाविक होते. औरंगजेब तर अतिशय प्रक्षुब्ध झाला. दक्षिणेत असलेल्या आपल्या सरदाराला - बहादूरखानला- शिवाजीविरुद्ध आक्रमक धोरण अंगिकारण्याचा त्याने इशारा दिला. बहादूरखान पेडगाव येथे छावणी करून राहिलेला होता. तो स्वतः ऐषारामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजीविरुद्ध मोहिम काढण्यामध्ये दिरंगाई करीत होता. औरंगजेबाकडून निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर बहादूरखानाने आक्रमणाची जय्यत तयारी सुरू केली. परंतु ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी अश्वदलाचे एक पथक पाठवून बहादूरखानाची छावणी लुटली. त्या लुटीमध्ये सुमारे १ कोटीचा खजिना मराठ्यांच्या हाती आला. या लुटीच्या प्रकारामुळे बहादूरखान चांगलाच हबकला. दरम्यान मराठ्यांनी खानदेशपर्यंत स्वारी करून धरणगाव लुटले आणि मराठ्यांचे हे पथक थेट बऱ्हाणपूरपर्यंत गेले. अशा प्रकारची दहशत मुघली प्रदेशात निर्माण होत असताना शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणीची मागणी केली. दुसऱ्या बाजूने शिवाजीच्या आदेशानुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी रामनगरपर्यंत मजल मारली आणि वसईच्या पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली. थोडक्यात राज्याभिषेकाचा सोहळा संपतो न संपतो तोच मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशात चांगलीच दहशत निर्माण केली. फोंड्याची लढाई औरंगजेबाच्या चिथावणीमुळे आदिलशाही दरबारातील सरदारही शिवाजीविरुद्ध लहानमोठ्या कारवाया करीतच होते. फोंड्याच्या सुभेदाराने शिवाजीच्या राज्यातील एका व्यापाऱ्याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. शिवाजीने आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित याला दोन हजार अश्वदळ देऊन ८०