भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 186, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 186

१५२ सार्थ तुकारामगाथा एकादशी सोडली. त्यामुळे दुर्वास रागावले. आपल्या जटेतून त्यांनी एक कृत्या निर्माण करून अंबरीषावर सोडली राजा विष्णुभक्त असल्यामुळे सुदर्शनचक्र दुर्वासाच्या पाठीमागे लागले दुर्वास घाबरून अखेर राजाकडे आले. एक वर्षाच्या उपवासानंतर त्याने मग दुर्वासासह भोजन करून पारणे फेडले. हा अंबरीष राजा असा विष्णुभक्त होता हा बार्शी येथील राहणारा असून वारकरी पथीयोना बार्शीच्या भगवानाचे दर्शन यासाठींच प्रिय आहे ३१३ करवितां व्रत अर्धं पुण्य लाभे । मोडवितां दोघें नरका जाती ॥ १ ॥ शुद्धबुद्धि होय' दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ २ ॥ आपुलें देऊनी आपुलाचि घात । न करावा थीत जाणोनियां ॥ ३ ॥ देऊनियां वेच धाडी वाराणसी । भेदावें चोरासि चंद्रबळ ॥ ४ ॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोहूं नये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- थीत-व्यर्थ, वेच-खर्च, चंद्रबळ-चंद्राचे बळ, मारग-मार्ग अर्थ - कुणाकडून का होईना पण एखादे व्रत करविले तर त्यात अर्धं पुण्य लागते. त्या व्रताचा भंग केला तर मात्र दोघेही नरकास जातात. १ दोघांचीही बुद्धी शुद्ध असली तरच दोघांची मनेही एकच होतात. चोराच्या संगतीत कुणाला स्वत.च्या जिवाची शाश्वती वाटणार ? २ आपले देऊन आपलाच घात होणार असेल तर तसे व्यर्थ न करणे हेच योग्य नाही का ? ३ एखादा काशीयात्रेस जात असेल तर त्याला खर्चासाठी पैसे देऊन पाठवावे पण चोरास मात्र चंद्राचे बळ अनुकूल असल्याचेही सांगू नये. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थव्रत, याग हा भक्तीचा मार्ग आहे; तो सोडू नये कधी. ५ ३१४ इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥ १ ॥ अवघेची येती वाण । अवघें शकुन लाभाचे ॥ २ ॥ अडचणी त्या केल्या दुरी । येण्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाण-जिन्नस, उरी-बाकी अर्थ :-या पंढरपुरात भक्तजनांचे घनदाट मार्ग सुरू झाले आहेत. ही एक त्याची इनामाची पेठच आहे १ या पेठेत सर्व वस्तू येतात. येथे सर्व शकुन लाभदायक होतात. २ या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, देण्याघेण्यातील बाकी येथे काही उरत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या पेठेत ज्याने आपला स्वतःचाच लाभ करून घेतला तो धन्य होय ४ ३१५ वेदाचे गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥ १ ॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारे । तारी एक सरे भवसिंधू ॥ २ ॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गव्हर-अंतरंग, मर्म, सोपारें-सोपे, एकसरें-एकदम अर्थ - नुसते शब्द पाठ करणाऱ्या शास्त्रीपंडितांना वेदांचा अर्थ समजत नाही व दुसऱ्याही लोकांना त्याचा अधिकार नाही. १ एका विठ्ठलाचेच नांव सहज, सुलभ व सोपे आहे. ते एकदम संसारसागर तरून नेण्यास समर्थ आहे. २ जे केवळ मंत्र, तंत्र काळवेळ यानाच जाणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे; व इतर लोक तर मूर्खच आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विधिनिषेध संपल्यामुळे या मार्गांचा नाश झाला आहे. ४ १ दोघां होय.