भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 297, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 297

कर्मीं गुंतले रिकामे । जपी तपी येयें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥ ३ ॥ एकदर शिक्का । पाठविला इहलोक । आलीं म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नीट-धीटपणे लढण्यास सिद्ध मुमुक्षू-मोक्षाची इच्छा करणारे, दमामे-नगारे, शिक्का-शिक्का अर्थ - बळकटपणे काचा घालून मी प्रत्यक्ष यमाशीहो लढण्यास धीटपणे सिद्ध झालो आहे संसाररूपी सागर तरून जाण्यास मी या नामस्मरणाची नावच तयार केली आहे १ या हो जे कोणी लहान, थोर, नर, नारी, कुठल्याही जातीचे, तुम्ही असा कुणासही इकडे येण्यास विचार करण्याची जरुरी नाही निश्चित मनाने यावे २ कुणी कामात आपापल्या व्यवहारात गुंतलेले असतील, कुणी रिकामे असतील, कुणी जप करण्यात गुंतले असतील, कुणी तपश्चर्येत व्यग्र असतील, कुणी मुक्त असतील, कुणी मोक्षाची इच्छा करणारे असतील सर्वांसाठी मी येथे विठ्ठलाच्या नामस्मरणाचे नगारे सुरु केले आहेत ३ या सर्व लोकांना एकच नामाचा शिक्का या लोकात उपयोगी असल्याने ईश्वराने पाठविला आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी या नामाचा धारकच येथे आलो आहे ४ ५२० आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्तावया ॥ १ ॥ झाडू संताचे मारग । आडरानें भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥ २ ॥ अर्थे लोपलीं पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । विषयलोभी मन । साधने बुडविलीं ॥ ३ ॥ पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वैकुंठवासी-श्रीविष्णूच्या वैकुंठात राहणारे साच-खरोखर, लोपलीं-लपली, शब्दज्ञाने- शाब्दिक ज्ञानाने अर्थ - खरे म्हणजे आम्ही वैकुंठात श्रीविष्णूरोबर राहणारे असून एका विशिष्ट कारणासाठी आम्ही या भूमीवर आलो आहोत पूर्वी ऋषिमुनींनी जे सांगितले तेच सत्यार्थाने सांगण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी आम्ही या पृथ्वीवर अवतरलो आहोत १ पूर्वीच्या सब साधुसंतांचे, ऋषिमुनींचे मार्ग आम्ही झाडून स्वच्छ करू जग आडरामाच्या बिकट मार्गाने चालले आहे पण त्यात आम्ही साधुसंतांच्या व प्राचीन ऋषिमुनींच्या उच्छिष्टारूपा भागाचे सेवन घडवून नीट सरळ मार्गावर आणू व आम्हीही तो भाग सेवन करू २ आज पुराणातील खऱ्या अर्थाचा लोप झाला असून केवळ शाब्दिक ज्ञानाने सब आयुष्याचा नाश आरंभिला आहे सर्वांच्या मनात विषयाचाच लोभ असल्याने सर्व महत्त्वाची साधन बुडाली आहेत ३ परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मात्र या भक्तीचाच डांगोरा पिटू या भक्तीचाच प्रचार करू यामुळे प्रत्यक्ष यमासही दरारा वाटेल चला त्या हरीच्या नामाचा जयजयकार मोठ्या आनंदाने करा ४ विवरण - तुकोबांचे आत्मप्रचीतीचे, आत्मसामर्थ्याचे, आत्मविश्वासाचे व आपण कोणत्या कार्यासाठी जन्मलो आहोत यासंबंधीच्या निश्चित जाणिवेचे जे काही अभंग आहेत, त्यात वरील दोन अभंगाना फारच महत्त्व आहे सर्व जातीच्या, सर्व पंथाच्या, सर्व वयाच्या स्त्रीपुरुषाना त्यांनी या भक्तिमार्गात पाचारण केले आहे या नामस्मरणाच्या मार्गावर त काचा घालून प्रत्यक्ष यमाशीही लढण्यास सिद्ध झाले आहेत त्यांच्या या सामर्थ्यामुळे