सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 344, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३१० सार्थ तुकारामगाथा हा विचार निर्धाराने मला समजला आहे. देवा, तुला माझा विसर कधीच पडणार नाही, हेही मला पक्के माहीत आहे. तू मला धीर देऊन सदैव जवळच असतोस. अंतर्बाह्य स्वरूपात तूच माझ्याजवळ असतोस. ३ दुःख कसे असते ते स्वप्नातही मला दिसत नाही. मुक्ती व भोगवृत्ती या काम करणाऱ्या दासी होऊन राहिल्या आहेत. त्या सर्वांचे रहस्य तुझ्यात असून तू तर प्रेमाच्या सुखासाठी आम्हाजवळ राहिला आहेस. ४ ज्या ठिकाणी तुझ्या कीर्तनाचा नित्य घोष असतो, तेथे सर्व पापे जळून नष्ट होतात. मग आमच्या आनंदास कमतरता कसली ? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मोठ्या प्रीतीने या ब्रह्मरसाचे, ईश्वराच्या ऐक्याचे सेवन करू. ५ ६३० देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥ १ ॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुढती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥ २ ॥ आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळिकवैकुंठ ॥ ३ ॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीतीं तया सुखा ॥ ४ ॥ तुझियां नामाचीं भूषणें । तों ये मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- कृपाळ-कृपाळू, प्रतिपाळ-सांभाळ. अर्थ :- देवा, तू आमच्याविषयी फार कृपाळू आहेस रे भक्तांचा सांभाळ करणारा तू दीनवत्सल आहेस तू मोठी स्नेहाळ अशी माउली आहेस. आमचा सर्व भार तू घेतला आहेस १ आमची सर्व चिंता देवा, तुलाच लागली आहे. आमचे पाऊल वाकडे पडले तर तूच आमचे त्यावेळी रक्षण करितोस. मग पुढे तू आम्हास संतांच्या स्वाधीन करतोस आम्हाला दूर लोटण्यास तुला धीर कसा होणार ? २ त्यामुळे आता आम्हाला भय नाही की कसली चिंता नाही कसलाही धाक नाही जन्ममरणाविषयी काळजी नाही इहलोक व परलोकही आम्हास एकसारखाच झाला. सर्व ठिकाणे आम्हास वैकुंठाप्रमाणेच झाली. ३ दिवस आहे की रात्र आहे, हेही आम्हास समजेनासे झाले आहे. तुझ्या नामस्वरूपाची अखंड ज्योत अंतःकरणात लागली आहे या आनंदलहरींचे वर्णन देवा, मी करू तरी किती? या सुखाचे वर्णन किती करावे ? ४ देवा, तुझ्या नामाच्या भूषणाचे अलंकार तू मला घातले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्यामुळे आम्हास काहीही कमी पडणारे नाही. ५ ६३१ न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलो ॥ १ ॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघडचा नागविलो चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ २ ॥ तुज मागणें इतुले आतां । मज या निरवावें संतां । जाला घंटस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥ ३ ॥ अति हा निकट समय । मग म्यां करावे तें काय । दिवस गेलिया ठाकील छाय । उरेल हाय रातिकाळीं ॥ ४ ॥