सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 526, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसौजन्य असून यासाठी ह्याचा उपयोग आपणास मोठाच आहे म्हणून काही ह्याला आपल्या पदरात बांधून घेता येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, विंचू व सर्प ही नारायणाची रूपे, परंतु ह्यांना न शिवता दुरूनच वंदन करावे ३
१०७९ भूत भविष्य फळो यावे वर्तमान । हे तो भाग्यहीन त्याची जोडी ॥ १ ॥ आम्ही विष्णुदासीं देव घ्यावा चित्ते । होणार ते होतें प्रारब्धें ॥ २ ॥ जगत्डीसाठीं घातले दुकान । जातो नारायण अतरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा ऋद्धिसिद्धी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जोडो-प्राप्ती अर्थ - आपणास भूतकाळातील व भविष्यकाळातील वर्तमान समजावे म्हणून पुष्कळ लोकांची खटपट असते पण या ज्ञानाची प्राप्ती ही भाग्यहीन माणसांस होते म्हणजे ही प्राप्ती काही विशेष भाग्याची नव्हे १ आम्ही विष्णुदासांनी मात्र निरंतर या देवाचेच चिंतन मनात करावे, व जे प्रारब्धानुसार असेल ते भोगावे २ केवळ जगदंडीसाठीच भूतभविष्य समजणाऱ्या लोकांनी दुकान घालून धंदा सुरू केलेला आहे पण त्यामुळे परमेश्वराचे पाय अंतरून जातात ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच मोठा गहन असून त्यात, ऋद्धिसिद्धींची पीडाही फार मोठी असते ४
घोंगड्यांचे अभंग- १२
१०८० ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥ १ ॥ पाघुरलो बहु काळें । घोंगडें वळें सांडवले ॥ २ ॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥ ३ ॥ तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धाडली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठकिले-फसविले, कुडी-देह, लाग-लाभ, हेवा-हाव अर्थ - मी काळाला फसवून दडी देऊन लपून राहिलो देहभावाची वृत्तीही टाकून दिली १ पुष्कळ दिवसांपर्यंत मी हे काळे घोंगडे पाघरले होते, ते मुद्दामच टाकून दिले आहे २ आता त्या काळात कसलाही लाभ होणार नाही, अशा दूरच्या ठिकाणी जाऊन मी लपलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य सेवा करण्याची माझी वरवरची हाय होती, तिची आटकाठी मी या प्रकाराने खटपट दूर केली ४
१०८१ घोगडिपाचा पालट केला । मुलामुला आपुल्यात ॥ १ ॥ कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिंसे सवगडिया ॥ २ ॥ तो बोले मी उगाच बैंसे । आनारिसे न दिसे ॥ ३ ॥ तुका म्हणे दिलें सोंग । नेदी व्यंग जाऊ देऊ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पिंसे-वेड, आनारिसे-वेगळेपणा अर्थ - खेळताना या गोपाळाच्या मुलानी आपल्या घोंगड्याची अदलाबदल केली. १ प्रत्येकजणाने कान्होबा मीच, असे सोंग घेऊन इतर सोबत्याना भलावणी केली. २ तो बोलतो व मी उगाच बसतो असे असले तरी, त्याच्यात व आमच्यात वेगळेपणा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने हे जे सोंग त्याना दिले आहे, ते काही व्यर्थ वाया जात नाही ४