भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 541, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 541

सार्थ तुकारामगाथा ४९५ भवभंजना व्यापका लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ॥ असो भावे जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥ ४ ॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पांयि तो राख देवा । असे मागतसे तुझी चरणसेवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- महोमंडळी-भूतलावर, रावराणे-श्रीमंत, भवतारक-संसारसागरातून तारून नेणारा, हरी-दुःख हरण करणारें, भवभंजना-संसारभावनेचा नाश करणारा, शेषफणी-शेष नावाचा नाग. अर्थ :- देवा, तुझ्याशिवाय इतर कुणास आम्ही काय मागावे ? विश्वाला व्यापून राहणाऱ्या देवा, या पृथ्वीवर तूच एक समर्थ असा आहेस. तुझ्यावाचून आम्हा जीवाच्या भावना कोण पुरवू शकणार रे देवा ? तुझ्याच कृपेने लोक श्रीमंत राजे वगैरे होतात १ या तीनही लोकात देवा, तुझ्याशिवाय मोक्ष देणारा कुणीही नाही. संसारातून तारणाराही तुझ्याखून कुणीही नाही. तुझ्या नामाचे व रूपाचे मनात चिंतन केले म्हणजे पाप व ताप पळून जातात. तुझ्या भयाने कामादिक वृत्तीं उरत नाहीत २ दुख हरण करणारा म्हणून तुझे नाव हरी, असे जे पुराणांत वर्णन केले आहे ते खरेच आहे. काळाच्या व गर्भादियोनींतून होणाऱ्या जन्माचा सर्व कारभार या श्रीहरीच्या हातातच असतो. तुझ्या नामास न उच्चारिता देवा, ही माझी वाणी देशोधडीस कशी पाठवू ? तुझे गोड गोड जर तिने वर्णन केले नाही तर सर्वच व्यर्थ आहे. ३ संसारवृत्तीचा नाश करणारा असा तू असून तिन्ही लोकांना तू भरून राहिलेला आहेस तुझे वर्णन करताना शेष नावाचा नागही थकून गेला. हा माझा जीव सर्व भावानी तुझ्याच पायी देवा, अर्पण केला आहे. याशिवाय दुसरे काही मागणे व्यर्थपणे मी कशासाठी करावे ? ४ देवा, तू दीनानाथ आहेस, अशी साक्ष सर्व लोकांना पटलेली आहे. तू अनेक दीन, पातकी व दोषी असणाऱ्या लोकांचा उद्धार केला आहेस. देवा, हा तुकाराम तुझ्या पायी शरण आला आहे, त्याचेही रक्षण करावेस तू, तो तुझी चरणसेवा मागीत आहे ५ १११० उभा भींवरेच्या तिरीं राहिलाहे । असे सन्मुख दक्षिणे मूस वाहे । महापातकांनो पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामबीर ॥ १ ॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । लागले मुनिवरा हे गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥ २ ॥ ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा धाययातो उदार । जया वोळगती सिद्धि सर्वठायीं । तुझें नाम हे चांगले गे विठाई ॥ ३ ॥ असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हे धरुनि भक्तिलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । थिटो माठली हे सिद्धसाधकांची ॥ ४ ॥ करा ये गुहा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुज्ञा तेंच साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आले । असे विश्व हे जीवनें त्याचि ज्यालें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - भीवरेच्या-भिदरा नदीच्या काठावर, पळ काप-थरकाप, खंती-काळजी, वोळगती- प्राप्त होतात, कटसूत्र-करगोटा, कटीवर हात ठेवून, ज्याले-जिवंत राहिले अर्थ :- हा श्रीविठ्ठल देव भिवरा नदीच्या काठावर उभा राहिलेला असून त्याच्या समोरही भिवरा नदी दक्षिणमुखी होऊन वहात आहे. याच्या नामामुळे महापातकांना सुद्धा मोठा थरकाप भरतो. या विठ्ठलाचे नामवीर, नामघोष करणारे थोर पाहा कसा नामाचा घोष करीत आहेत. १ हा देव गुणगंभीर असून मोठ्या धैर्याचा आहे. याच्या मुखावर हास्य आहे. अमृताप्रमाणे सुखदायक वाटणारे शब्द हा आपल्या मुखाने बोलत असतो सर्व मुनि- श्रेष्ठांच्या चित्तात याचेच गोड रूप स्थिर झाले आहे. याची देहभावना सुटून सर्व काळज्या यांच्या दूर झाल्या आहेत. २ या भूतलावर हा मोठा थोर कीर्तिचा आहे, असा याचा गौरव सर्वत्र झालेला आहे. भक्तांना त्याच्या इच्छेप्रमाणे