सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 543, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४९७ असे यांदवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया' वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्याती । पाहा सांवळें रूप हैं पावनासी ॥ ३ ॥ कसीं पाऊलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली देवांची । जया चिंतितां अग्नि हा शांति नीवे । घरा मानसीं आपला देहभाव ॥ ४ ॥ मुनो' देखतां मुग्ध हैं चित्त ध्याय । देह मांडला भाव हा बापमाय । तुक्या लागलें मानसीं देवपिसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका :- पैल-पलीकडे, पुंजाळ-चमकणारे, तुदिशी-शोभलेली, मोरखीसे-मोरपिसे, वळा-तेज अर्थ :- पलीकडे सावळ्या रंगाचे तेज पाहा कसे चमकणारे दिसत आहे ! त्याच्या डोक्यावर मोरपिसे शोभलेली आहेत. त्याला पाहताच मनातील पापताप दूर होतात. या योगिराज यादवास सर्वजणांनी भजावे, त्याचीच भक्ती करावी. १ याला सोळा सहस्र कुमारी लुब्ध झाल्या. त्या गोपकन्या अतिशय दिव्य व सुकुमार होत्या. त्यांच्या मध्यभागी हा कोटीचंद्राच्या तेजाप्रमाणे शोभिवंत दिसतो याच्या गळ्यात शोभून दिसणारी माळ त्याच्या रूपात विरून जाते. २ सर्व यादवांच्यात हा चक्रपाणी श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे, तीनही लोकातील तेहतीस कोटी देव त्याला वंदन करतात. महाकाळाप्रमाणे असणारे दैत्य याला पाहून कापू लागतात. पापाचा नाश करणारे, असे हे सावळे रूप तुम्ही मन लावून पाहावे ३ याची गोजिरवाणी पावले पाहा कशी कुंकुमाच्या रंगाची असून शोभिवंत आहेत याला दैववान अशी ही वीट कशी लाभलेली आहे याचे चिंतन करताच अग्नीसुद्धा शांत होऊन निवून जातो तुम्ही आपल्या मनास, आपल्या देहभावास मान जपावे ४ सर्व मुनीलोक सुद्धा याच्याच मुखाचे ध्यान आपल्या चित्तात करतात या देहातील भाव याच मायबापासाठी मी अर्पण केला आहे. या तुकारामाच्या मनास याच देवाचे वेड लागलेले असून हे चित्तचोरटे व सावळे रूप माझ्या मनात स्थिर असावे. ५ १११३ असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापूनी अग्नि हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबले बिंब हे ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥ १ ॥ तन वाटितां क्षीर हैं होत नाहीं । पशु भक्षितां पालटे तेंचि देहीं । तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापूनी अंतर्वाहि ॥ २ ॥ फळ कर्दळी शेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं तें याउगे धीग जालें । फळ पुष्पना यत्न ते व्यर्थ गेले ॥ ३ ॥ असे नाम हे दर्पणे सिद्ध केलें । असे बिंब तें या मळा आड ठेलें । कसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप । नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥ ४ ॥ करा वर्म ठावें नका सोंग वांयां । तुका वीनवितो पढों काय पायां । तुज पुत्र द्वारा धन वासना हे । मग उरलें शेवटीं काय पाहे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका :- नासु-नाश, तन-गवत, धीग-ढीग, पुष्कळ, दर्पणे-आरशाने अर्थ -हा श्रीहरी सर्व जीवात निवास करून आहे लाकडामध्ये अग्नी सुप्त स्थितीत ज्याप्रमाणे असतो, त्याप्रमाणे याचा वास सर्व वस्तूत असतो. घटामध्ये, आकाशाचे बिंब जसे पडावे, तसे याचे बिंब प्रत्येक ठिकाणी पडलेले आहे. घराचा, शरीराचा नाश झाला तरी, या बिंबाचा, चैतन्यतत्त्वाचा नाश कधी होत नाही १ गवत वाटून पाटून कितीही पेतले तरी, त्याचे काही दूध होणार नाही, पण गाईम्हशीने ते गवत खाताच त्याचे स्वरूप पालटून त्याचे उत्तम दूध तयार होते. याचे वर्म जाणणारा तोच एक श्रीहरी आहे. सर्व वस्तुमात्रात अंतर्बाह्य असा तोच व्यापून १ तया, २ मनी. तु गाथा ६३