भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 65, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 65

सार्थ तुकारामगाथा ३९ नाही म्हणूने ते धन तुला सोडावेच लागेल ४ बलवान मित्र, बाप, बहीण, आई, पत्नी हे बांधव व आप्त यांचे सैन्य जरी मोठे असले तरी त्याचा काहीच उपयोग शेवटी होणार नाही ५ कारण तुझी ही शक्ती जोपर्यंत प्रत्यक्ष काळ जवळ आलेला नाही तोपर्यंतच तू मिरवशील ६ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हा काळ जवळ नाही तोपर्यंतच तू काही करुन जन्ममृत्यूच्या चोऱ्यांशी लक्ष योनींच्या फेऱ्या चुकवीव ८७ कानडीनें केला मऱ्हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ॥ १ ॥ तैसे मज नको करु कमळापति । देईं या संगति सज्जनाची ॥ २ ॥ तिने पाचारिले इल या म्हणोन । येरु पळे आण जाली आता ॥ ३ ॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे शीण सुखा पोटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कानडीने-कर्नाटकातील कानडी बोलणाऱ्या स्त्रीने पाचारिले-बोलाविल एलदा-इकडे या, येह-हा नवरा आण-शपथ, येर येरा-एकमेकात विच्छिन्न-विसंगत अर्थ - आपणास संताची संगत हवी इतर कुणाची भलत्याची मिळाल्यास कसा शीण होतो ते या अभंगात बुवानी एक मोठ्या गमतीचे विनोदी उदाहरण घेऊन सिद्ध केले आहे एकदा एका कानडी भाषाच जाणणाऱ्या स्त्रीने मराठी बोलणाऱ्या माणसाशी लग्न केले पण संसार सुरु झाल्यावर एकाचे बोलणे दुसऱ्यास समजेना असा प्रसंग आला हे कमलापती विष्णू, मला मात्र तशी अवस्था देऊ नकोस, मला संताचीच संगत हवी २ नाही तर काय होईल पाहा, त्या कानडी बाईने 'इलबा-इकडे या' म्हणून नवऱ्याला बोलविले, पण नवऱ्याला वाटले हिन आपणास 'आ' शपथ म्हणून भलतीच शपथ घेतली त्यामुळे तो पळून जाऊ लागला ३ तुकाराममहाराज म्हणतात एकमेकास जे विसंगत असते त्यापासून सुख होण्याऐवजी दुःखच मोठे होते ४ ८८ सुख पाहता जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ १ ॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचे वचन ॥ २ ॥ नैलें रात्रीने तें अर्धं । बाळपण जराव्याधें ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुती जसी मूढा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जवापाडे-जवा एवढ अल्प जराव्याधें-म्हातारपण व रोग यांनी, पुढा-पुढील जन्म अर्थ - या संसारात माणसांस सुख जवाएवढे सुद्धा लाभत नाही उलट दुःख मात्र पर्वताएवढे अनुभवास येते १ याची आठवण धरुन मना, तू संताच्या उपदेशाप्रमाणे वाग २ कारण तुझे आयुष्य पाहा कसे चालले आहे निम्मे रात्रीच्या झोपेतच गेले काही बाळपणात गेले, काही म्हातारपणात व नाना रोगाच्या व्याधीत जाईल ३ आणि संतवचनाच्या साह्याने काही आताच उपाय न करोल तर पुढील जन्मीही तू असाच घाण्याला जुंपला जाशील ४ विवरण - तुकाराम महाराजांचा हा एक छोटा परंतु सर्वप्रसिद्ध असा अभंग असून यात मानवी समाजाच चित्र सथेपान पण यथायतनें रेखाटलं आहे या संसाराचा एकंदर अनुभव काय आहे ? हा संसार दुखमय की सुखमय ? संताचे उत्तर ठाम आहे आह की ईश्वरकृपा झाल्यास सर्वच सुखमय होऊन जात, मग दुःखेहा सुखच वाटतात परंतु ही अवस्था महतामहती सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी येत नाही तो संसारातील बाह्य वस्तूतच सुख शोधता द्रव्य, मान, कीर्ति, घर जमीन लौकिक यांच्या बाधीन मुख वाढेल अशी त्याची कल्पना असते पण ईश्वरी कृपेचिवाय हे सर्व व्यर्थ आह असाच त्याचा अनुभव असतो सब याह्य लौकिकाच्या वाढीबरोबरही ईश्वराशिवाय सुख जवा एवढे सुद्धा न दिसता दुःख मात्र पर्वताएवढे अनुभवास यत कारण या लौकिक गोष्टीच्या वागनेच सार आयुष्य व्यर्थ होाने ईश्वराकडे पाहण्यास वा त्याचे स्मरण करण्यास तुषाम वेळ आहे ? सुखदुःखाची रचनाच मुळात चुकलेली असते सुख म्हणजे काय ? दुख म्हणजे काय ? आपल्या शास्त्र- कारांनी शास्त्रीय व तात्त्विक पद्धतीने विचार केलेला आहे 'जे केवळ बुद्धीनेच ग्राह्य असून व ज इंद्रियातीत असत तेच आत्यंतिक सुख होय' (सुखमात्यंतिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ६-२१) असा निश्चय भगवद्गीतेतच