भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 68, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 68

४२ | सार्थ तुकारामगाथा

स्मरण झाले आहे, माझ्या आईप्रमाणे तू आहेस, माय पांडुरंगे, तू माझ्यासाठी लोकर धावत ये २ पुष्कळ जन्मात जे काही पापपुण्य हातून घडले असेल त्यांच्या ओझ्याखाली मी दडपून गेलो आहे. यातून मुक्त व्हावे असे काही रहस्य मला सापडले नाही. ३ आतून व बाहेरून असा नाना प्रकाराच्या चोरांनी मी वेढलो गेलो आहे, माझी दया कुणासही येत नाही ४ देवा, याच्यामुळे मी फारच पंगू झालो असून माझी नागवणही फार झाली आहे. पुष्कळ दिवस झाले, मी अगदी कासावीस होऊन गेलो आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू दीनाचा नाथ आहेस ना ? दीनाचे रक्षण करणे हे तुझे ब्रीद आहे ना ? ते ब्रीद सांभाळण्यासाठी दीनानाथा, आता तू सत्वर धावून ये व माझे रक्षण कर ६

विवरण - तुकारामबुवांच्या परिजपर अथवा आत्मपर अभंगातील हा एक अतिशय महत्त्वाचा अभंग आहे. यात बुवांनी आपणास वैराग्य का व कसे प्राप्त झाले त्याचा संक्षेपाने निर्देश केला आहे आपणास संसाराचा फार त्रास झाला, लोकांनी आपणास फार नागविले, लुबाडले, चोरांनी आतबाहेर दरोडे घालून आपली लूट नेली कोणता त्रास तुकाराममहाराजांच्या संसारात होता ? कोणी त्यांना लुबाटिले? नागविले? स्वतःच्या संसारासबंधी आणखीही काही अभंगातून तुकारामबुवांनी अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे 'संसाराच्या नावें घालुनिया शून्य । वाढता हा पुण्य धर्म मेला,' संसाराचे ओझें वाहतां वाहविता । तुजविण अनंता नाहीं कोणी,' 'देव भक्तालागीं करुं नेदी संसार,' 'जाला हा वमन संसार,' 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' इत्यादी वचनातून असे प्रत्ययास येते की बुवांचा संसार वरवर तरी सुखाचा झाला नसावा

प्रारंभी प्रारंभी तरी तुकोबांना संसाराची वर्षे बरी गेली असावीत दुकानदारी चांगली चालत असावी घरांत महाजनकी होती परंतु पुढे एकामागून एक अशी सांसारिक दुःखे त्यांच्यावर कोसळली 'मातापिता बंधु सज्जन । परी उदंड धनधान्य । शरीरीं आरोग्य लोकात मान्य । एकही उणे असे ना' अशी परिस्थिती असताना तुकारामावर अनेक आघात सतत होत राहिले 'बाप मेला न कळतां' यावरून बुवांच्या ऐन वयाच्या वेळी त्यांचे वडील एकाएकी मरण पावले असे दिसते मग संसाराची सर्व जबाबदारी त्यांच्याचवर येऊन पडली आईही थोड्याच दिवसात मरण पावली तुकारामबुवांचा बंधू सावजी याची बायकोही याच सुमारास मृत्यू पावली व आधीच वैराग्यशील असणारा सावजी घर सोडून तीर्थयात्रेरा निघून गेला. तुकारामाचे एक मूल व पहिली स्त्री हीही माणसे दगावली या भयानक अशा मृत्यूच्या थैमानामुळे आधीच बोबळे असलेले तुकारामाचे मन व्यथित झाले दुसरी पत्नी त्यांचे मन हळुवारपणे सांभाळील अशी नव्हती

घरातील या आघातात बाह्य स्थितीचेही प्रहार त्यांच्या मनावर सतत झाले व्यथित चित्त असल्यामुळे अद्यावर, दुकानदारीवर मन राहिले नाही त्यात दिवाळे निघण्याची वेळ आली दुष्काळाची भर पडून माणसे व दावणीची गुरे हैराण झाली या वेळच्या दुष्काळांचे स्वरूपही भयानक होते 'पर्जन्य गेला देशान्नून । दुष्काळ आला पुढें कठिन । मुलें माणसे खायावांवून । होतीं हैरान सर्वथा' असे वर्णन या काळाचे महिपतीने केले आहे तुकोबाचा व्यापार चालेना, द्रव्यहानी फार झाली जगात अपमान झाला 'सावकार पिटिती दपाळ । लाता हळहळ करी' अशा भयंकर अवस्थेत बुवा सापडले होते 'एकविसाव्यात विपरीत काळ । तुकयासि पातला हरकाळ । तेव्हा निघताचि दिवाळें । सोइरे सकल हासती' अशा परिस्थितीत बुवांचे मन खिन्न झाले स्वत तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका महत्त्वाच्या अभंगात म्हटले आहे की, 'खटतारें जालों अति दुःखी दुःखी । मायबाप सेसों धर्मलिया । बहु पीडिलों संसारें-' घरातील जिवलगाचा मृत्यू, सन १६३०-३१ चा भयंकर दुष्काळ व त्यायोगे झालेली व्यापारहानी यामी तुकारामबुवा विव्हळ होऊन गेले 'मंद झाल्या मेघवृष्टि', 'अपीक धान्यें दिवसेदिवस', 'भेप पडो भोती' अशा भोवतालच्या भीषण स्थितीचे बुवांनी आपल्या अभंगातून उल्लेख केले आहेत त्यांना समकालीन वाङ्मयपत्रांचाही पुरावा मिळतो समर्थ रामदास स्वामींनी या असमानी संकटाचे हृदयभेदक वर्णन केले आहे 'काळ बुष्काळे कहर पडता', 'पाथली ज्वारीस एक दोन अशी धारण बसली', 'उपवासीं मरो लागलो' असे उल्लेख त्या वेळच्या सरकारी वाङ्मयपत्रातूनही मिळतात

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 68, कुल 611 में से · BharatKosha