छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 10, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंहिंदु समाज एकसंघी राहू शकला नाही. हलकी कामे करणाऱ्या जातींनी अस्पृश्य समजण्यात येऊ लागले. परिणामी हा समाज पूर्ण दरिद्री व अज्ञानी राहिला. स्पृश्य जातीकडून अस्पृश्य जातीवर अन्याय होत असे. त्यामुळे अस्पृश्यांचे जीवन अधिकच केविलवाणे झाले होते. जाती व्यवस्थेच्या या दुष्परिणामामुळे हिंदु धर्मियांचे संघटन होऊ शकले नाही. शस्त्र आणि शास्त्र यापासून बहुजन समाज वंचित राहिला. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. बालविवाह, विषमविवाह, सतीची चाल, विधवांना उपेक्षित स्थान, निरक्षरता, पुरुषजातीचे वर्चस्व यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झालेले होते. बहमनी राजवटीत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन फारसे बदलले नाही. परंपरागत गावकीचे अधिकार पाटील-कुलकर्णी आणि देशमुख-देशपांडे यांच्याकडे अबाधित राहिले होते. वतनदारांच्या दृष्टीने केवळ राज्यकर्ते बदलले होते, त्यांच्या अधिकारात कोणताही बदल झाला नव्हता. बहमनी राज्यकर्त्यांनी परंपरागत ग्रामीण जीवनात कसलाही हस्तक्षेप केला नाही. महसूल गोळा करण्याचे काम वतनदाराकडे ठेवणे त्यांना सोईचे वाटले. प्रांताचे अधिकारी आणि वरिष्ठ अंमलदार ही पदे मात्र विश्वासातील मुसलमानाकडे राहतील याची खबरदारी बहमनी राज्यकर्त्यांनी घेतली. लष्करामध्य स्थानिक हिंदूंना कसलेही स्थान नव्हते. एवढेच नव्हे तर दक्षिणेत स्थायिक झालेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये विशेष स्थान राहिले नाही. तुर्कस्थान,अरबस्थान, इराण या देशातून आलेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये स्थान मिळू लागले आणि त्यातूनच पुढे परदेशी मुसलमान आणि स्थानिक मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष पेटू लागला. बहमनी राज्यकर्त्यांची महाराष्ट्रातील समाज जीवनावर घट्ट पकड असतांनाही, वारकरी संप्रदायाचे भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडविण्याचे आणि समाज संघटन करण्याचे कार्य अविरतपणे चालू होते. संत भानुदास, दामाजी, कान्होपात्रा, सेना न्हावी यांसारख्या संतांनी ज्ञानेश्वर नामदेवापासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे चालू ठेवली. वारकरी संप्रदायाचे कार्य अतिशय मोलाचे असून त्यामुळे समाजजीवनात स्थैर्य कायम राहिले. एकसंघी बहमनी राजवटीत सूफी पंथाचे अनेक साधु दक्षिण भारतात स्थायिक झाले. राजाश्रयाच्या आधाराने त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. परंतु हा प्रसार विशेषतः शहरी भागापुरता मर्यादित राहिला. शाही राजवटीतील महाराष्ट्र मागे सांगितल्याप्रमाणे पंधराव्या शतकाच्या अखेरीस एकसंघी बहमनी ४ छत्रपती शिवाजी महाराज