भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 26, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 26

पाठवून शहाजीला कैद केले. आणि त्यानंतर अफजलखानाने शहाजीला पायात बेड्या घालून विजापूरला आणले. शहाजीला पकडल्यानंतर आदिलशहाने शिवाजीविरुद्ध फत्तेखान या सरदारास पाठविले. शिवाजी पुरंदरच्या किल्ल्यावर असल्याचे समजताच फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला. पण शिवाजीच्या मावळ्यांनी असा प्रखर प्रतिकार केला की फत्तेखानाला पळून जावे लागले. आदिलशहाने शहाजीचा थोरला पुत्र संभाजी याचेविरुद्धही फऱ्हादखान आणि तानाजी दुरे यांना पाठविले होते. पण हे दोघेही अपयश पदरात घेऊन परत आले. या पराभवामुळे आदिलशहा अधिकच संतप्त झाला. शहाजीला किती दिवस अटकेत ठेवावे हा प्रश्नही आदिलशहापुढे होता. कारण आदिलशाहीतील मराठा सरदारांमध्ये असंतोष वाढू लागला होता. तेव्हा शहाजीची सुटका करण्यासाठी शिवाजी व संभाजी यांच्यावर दडपण आणून महत्त्वाचे किल्ले परत मिळवावेत आणि आपली प्रतिष्ठा सांभाळावी असा विचार आदिलशहाने केला. त्याप्रमाणे कोंढाणा, बंगळूर व कंदर्पी हे ३ किल्ले शिवाजी आणि संभाजी यांनी आपल्या ताब्यात द्यावेत म्हणजे शहाजीची सुटका करण्यात येईल अशी अट त्याने घातली. हे ३ किल्ले ताब्यात घेतल्यावर शिवाजी आणि शहाजी या दोघांच्याही हालचालीवर नियंत्रण करता येईल अशी आदिलशहाची अटकळ होती. शहाजीची सुटका महत्त्वपूर्ण असल्यामुळे शिवाजी आणि संभाजीने हे तीनही किल्ले आदिलशहास दिले. त्यानंतर आदिलशहाने शहाजीची सुटका केली. सुटकेनंतर कर्नाटकात येऊन शहाजीने पुन्हा आपला दबदबा निर्माण केला. शिवाजी महाराजांनाही कोंढाणा गेल्याचे विशेष दुःख झाले नाही. कारण पुरंदरसारखा महत्त्वाचा किल्ला अद्याप शिवाजीच्या ताब्यात होता. तूर्त आदिलशहाच्या वाटेस न जाता जनतेवर जुलूम करणाऱ्या उन्मत्त मराठा सरदारांना वठणीवर आणण्याचे धोरण शिवाजीने स्विकारले आणि त्याप्रमाणे आपला मोहरा जावळीच्या चंद्रराव मोऱ्याकडे वळविला. २० छत्रपती शिवाजी महाराज