भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 27, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 27

४. स्वराज्याचा विस्तार जावळीचे चंद्रराव मोरे जावळीच्या प्रदेशावर सरदार मोरे यांचा अंमल होता. या मोरे घराण्यातील पुरुषांना चंद्रराव हा पिढीजात किताब होता. शिवाजीने स्वराज्यकार्यास प्रारंभ केला, त्या सुमारास जावळीवर दौलतराव मोरे (चंद्रराव) यांचा अंमल होता. या दौलतरावच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न निर्माण झाला. कारण दौलतराव निपुत्रीक होता. तेव्हा त्याच्या पत्नीने शिवथरकर मोऱ्यांपैकी यशवंतराव यास दत्तक घेऊन त्याला जावळीच्या जहांगिरीची सूत्रे दिली. विशेष म्हणजे या यशवंतरावास शिवाजीने पाठिंबा देऊन आपला प्रभाव जावळी प्रदेशात वाढविण्यास सुरुवात केली. मोरे घराण्यातील काही पुरुष यशवंतरावविरुद्ध बंड करून उठले. त्यामुळे जावळी प्रदेशात एक नवा संघर्ष सुरू झाला. या सुमारास अफजलखान हा वाईचा सुभेदार होता. शिवाजीच्या हालचाली ओळखून खानाने यशवंतरावाची जहागिरी हिसकावून घेण्याचा घाट घातला. परंतु स्वतः यशवंतराव धूर्त असल्यामुळे तो स्वतः आदिलशहाशी अत्यंत नम्रतेने व लीनतेने वागत होता. त्यामुळे खानाला त्याचेविरुद्ध कारवाई करणे अशक्यप्राय वाटू लागले. त्यात आदिलशहाने १६५५ मध्ये अफजलखानाला कर्नाटकाच्या कामगिरीवर पाठविले. आदिलशहाची मर्जी संपादन करण्यासाठी यशवंतराव मोरे शिवाजीच्या प्रदेशावर लहानसहान हल्ले करू लागला. शिवाजीचे सहकारी सिलिंबकर देशमुख यांच्याशी गुंजणमावळच्या देशमुखीवरून यशवंतरावाने भांडण उकरून काढले. सर्वात चीड आणण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवाजीच्या जहागिरीतील गुन्हेगारांना आश्रय देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. मोसे खोऱ्यातील रंगो त्रिमल या गावकुलकर्ण्याने अनैतिक कृत्य केले होते. त्याला पकडून शिक्षा करण्याची शिवाजीची इच्छा होती. या रंगो त्रिमलला यशवंतरावाने आश्रय दिला. तेव्हा जावळीच्या या उन्मत्त जहागिरदाराला शासन करण्याचे शिवाजीने ठरविले. २१