भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 31, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 31

अली'चा कर्ता रुहूल्ला हा लिहितो की, “बादशहाने अफझलखानाला जातेवेळी सांगितले होते की, शिवाजीने वाटेल ते सांगितले तरी त्याचे बिलकुल न ऐकता त्याचा नाश करावा.” डच पत्रव्यवहारामध्येही शिवाजीचा नाश करण्यासाठीच विजापूर दरबाराने अफझलखानाची नेमणूक केली होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तारिखे अली, डच पत्रव्यवहार, आदिलशाही फर्मानि इ. साधनांच्या आधारे असे स्पष्ट दिसून येते की, खानाने शिवाजीचा नाश करावा म्हणून त्याची नेमणूक विजापूर दरबाराने केली होती. शिवाजीची सावधगिरी विजापूरहून निघताना अफझलखानाने शिवाजीच्या प्रदेशात दहशत निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचप्रमाणे धर्मस्थळांना इजा करून शिवाजीला डिवचण्याचे क्षुद्र राजकारण त्याने केले. तुळजापूर, माणकेश्वर, करकंब, भोसे, पंढरपूर इ. धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख अज्ञानदासाच्या पोवाड्यात आढळतो. तुळजापूर आणि पंढरपूर या दोन धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख सभासदाने केला आहे. वाईकडे येताना फलटणजवळ मलवडी या ठिकाणी बजाजी निंबाळकर यास खानाने पकडले आणि हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. परंतु खानाच्या बरोबर असलेले मराठे सरदार नाईकजी राजेपांढरे यांच्या मध्यस्थीमुळे बजाजीची सुटका झाली. खानाच्या साऱ्या हालचाली शिवाजी अत्यंत सावधपणे पहात होता. आपल्या जनतेमध्ये दहशत निर्माण करून आणि धर्मस्थळांना उपद्रव देऊन खान आपल्याला अस्वस्थ आणि संतप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे हे शिवाजीने ओळखले. खानाची पावले ओळखून त्याचा प्रतिकार करण्यासाठी सावधगिरीचा मार्ग शिवाजीने स्वीकारला. १६५९ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी शिवाजीने जावळी खोऱ्यात आपला मुक्काम हलविला. लष्करी डावपेचाच्या दृष्टीकोनातून जावळीचा प्रदेश शिवाजीच्या दृष्टीने मोठा सोईचा होता. खानानेसुद्धा जावळीचा प्रदेशच शिवाजीची कोंडी करण्यास सोईचा आहे असाच विचार केलेला होता. कारण खानाने वाईची सुभेदारी केलेली होती. त्यामुळे जावळी भागातील दऱ्याखोऱ्यांची त्याला माहिती होती. सुभेदारी करीत असताना जावळी आणि वाई भागातील देशमुखांना खानाने आपल्या कब्जात आणले होते. शिवाय आदिलशहाच्या फर्मानाप्रमाणे या भागातील देशमुख खानाला मदत करतील अशी अपेक्षा होती. खानाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. स्वराज्याचा विस्तार २५