भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 32, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 32

जावळीच्या मोऱ्यांपैकी प्रतापराव मोरे हा खानास येऊन मिळाला होता. जावळीच्या खोऱ्याचा बारीकसारीक तपशील प्रतापरावाला माहित होता. वाई- जावळी या प्रदेशाची निवडही खानाने हेतुपुरस्सरच केली. खानाजवळ १२,००० अश्वदळ आणि १०,००० पायदळ होते. शिवाय ७५ मोठ्या तोफा आणि सुमारे ४०० लहान पहाडी तोफा खानाजवळ होत्या. शिवाजीकडे १०,००० अश्वदळ व १०,००० पायदळ होते. वाईला आल्यानंतर खानाने शिवाजीच्या राज्यात धुमाकूळ घालण्यासाठी वेगवेगळ्या भागात शिरवळ भागात पांढरे, तर सुपे भागात जाधव, सासवडकडे खराडे तर पुण्याकडे हिलाल आणि कोकणामध्ये सैदखान ह्यांना खानाने दहशत निर्माण करण्यासाठी ससैन्य पाठविले. खानाच्या या सरदारांनी शिवाजीच्या राज्यात धुमाकूळ घातला. आपल्या प्रदेशाची नासाडी चाललेली पाहून शिवाजी नामोहरम होईल असा खानाचा कयास होता. पण खानाच्या सरदारांनी उठविलेल्या या वावटळीकडे शिवाजीने पूर्ण दुर्लक्ष केले. तेव्हा शिवाजीची प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय खानाने घेतला. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा प्रथम शिवाजीला जाऊन भेटला. शिवाजीने भेटीची अनुकूलता दर्शविली आणि त्यानंतर आपला वकील पंताजी गोपीनाथ याला खानाकडे पाठविले. वकीलांच्या भेटीगाठी चालू असताना खानाच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा शिवाजीने प्रयत्न चालविला. शहाजीला खानाने दिलेली वागणूक आणि थोरला भाऊ संभाजी याच्या पारिपत्यास कारणीभूत झालेल्या खानाच्या कारवाया शिवाजीला माहित होत्या. खान दगाबाजी करण्यात पटाईत आहे याचीही कल्पना शिवाजीला होती. कर्नाटकातील शिऱ्याचा राजा कस्तुरीरंगा याला भेटीस बोलावून १६३८ मध्ये खानाने त्याला दगाबाजीने मारले होते. शिवाजीचे वकील पंताजी गोपीनाथ यांनी खानाच्या गोटाची चाहूल घेऊन भेट घेण्यापाठीमागे खानाचा अंतस्थ हेतू काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला. सभासदाने आपल्या बखरीत म्हटले आहे की, 'पंताजी पंताने खानाच्या मनात दुष्टबुद्धी आहे' असा इशारा शिवाजीला दिला होता. त्यामुळे शिवाजीने अधिक सावधगिरी बाळगण्याचे ठरविले. अफझलखानाचा वध खान आणि शिवाजी यांच्या वकीलांनी भेटीगाठी घेऊन भेटीची तारीख १० नोव्हेंबर १६५९ ही निश्चित केली. शिवाजी आणि खान यांच्या भेटीचा संपूर्ण तपशील दोन्ही वकिलांनी ठरविला. प्रतापगडाच्या माचीवर मार्गशिर्ष २६ छत्रपती शिवाजी महाराज