भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 34, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 34

असे विजापूरी सैन्याच्या स्वप्नातही नव्हते. त्यामुळे त्यांची अक्षरशः फजिती झाली. विजापूरी फौज सैरावैरा धावत सुटली. खानाचा मुलगा फाजलखान हा प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने निसटून गेला. खानाकडील हत्ती, उंट, घोडी व लाखो रुपयांचे जडजवाहीर मराठ्यांना लुटीत मिळाले. विजापुरी सैन्यातील अनेक सैनिक व अंमलदार शिवाजीला शरण आले. त्यांना अभय देण्यात आले. युद्ध संपल्यावर युद्धात ज्यांनी बहुमोल कामगिरी बजावली अशा शूर मराठ्यांना शिवाजीने भरपूर बक्षिसी दिली. पण त्याचबरोबर ज्यांनी विश्वासघात केला त्यांना कडक शासनही केले. खंडोजी खोपडे या देशमुखाने विश्वासघात करून खानाला मदत केली होती. शिक्षा म्हणून त्याचा एक हात व एक पाय तोडण्यात आला. पंताजी गोपीनाथ यांना अलंकार व वस्त्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. १६६० च्या अखेरीस शिवाजीने जाहिरनामा काढला. त्यान्वये अफजलखानाचा वध होण्यापूर्वी पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती या परगण्यातील ज्या ज्या हिंदूंकडे आणि मुसलमानाकडे इनामे आहेत ती पुढेही तशीच चालत राहतील असे जाहिर करण्यात आले. मराठ्यांच्या इतिहासात अफझलप्रसंगाला विशेष महत्त्व आहे. या घटनेनंतर सारा मावळ प्रदेश आणि जावळी खोऱ्याचा प्रदेश शिवाजीच्या पूर्ण स्वामित्वाखाली आला. पारतंत्र्यात खितपत असलेल्या या भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला. शिवाजीविषयी मोठा आदरभाव जनतेमध्ये निर्माण झाला. या भागातील देशमुख, देशपांड्यांसारख्या वतनदारांनाही शिवाजीची महती कळून आली आणि बहुसंख्य वतनदारांनी शिवाजीचे स्वामित्व मान्य केले. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने स्वराज्य आकारास आले. शिवाजीच्या सरदारांतही मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. याचे प्रतिक म्हणजे या घटनेनंतर केवळ १५ दिवसात पन्हाळ्यासारखा दुर्गम किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. (२८ नोव्हेंबर १६५९) खानाच्या लष्करातले पांढरे, खराटे, सिद्दी हिलाल यासारखे अनेक सरदार शिवाजीकडे चाकरीसाठी आले. त्यामुळे शिवाजीच्या सामर्थ्यात भर तर पडलीच, परंतु आदिलशहासारखा बलाढ्य शत्रूही भयचकीत झाला. पन्हाळ्यात शिवाजी मोठा पराक्रम गाजवून शत्रूला चकीत करायचे आणि शत्रू बेसावध झालेला पाहून त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावयाचा हा शिवाजीच्या रणनीतीचा भाग होता. अफझलप्रसंग घडल्यानंतर शिवाजीने एकदम तीन स्वाऱ्यांची २८ छत्रपती शिवाजी महाराज