भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 119, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 119

स्वराज्य स्थापना केली आणि राज्यविस्तार केला. कोणत्याही राज्यकर्त्यापेक्षा महाराजांनी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले. शिवकालामध्ये किल्ल्यांचे ३ प्रमुख प्रकार होते. १) गिरिदुर्ग २) स्थलदुर्ग ३) जलदुर्ग. यामध्ये शिवाजी महाराजांनी गिरिदुर्गांचे महत्त्व वाढविले. त्यांच्या बहुतेक राजकीय हालचाली गिरिदुर्गावरूनच झालेल्या आढळतात. आपल्या राजधानीसाठी प्रथम राजगड आणि नंतर रायगड या गिरिदुर्गांचीच निवड महाराजांनी केली होती. स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत भिडल्यानंतर जलदुर्गांची उभारणीही महाराजांनी केली. १६६७ मध्ये मालवणजवळ सिंधुदुर्ग हा किल्ला बांधून महाराजांनी आपली सागरी राजधानी येथे केली. स्वराज्यामध्ये एकंदर दोनशेचाळीस किल्ले होते. प्रत्येक किल्ल्यासाठी तीन अधिकारी नेमले जात. हवालदार, सबनीसं आणि कारखानीस. अशा र्या तीन अधिकाऱ्यांकडे किल्ल्यांचा कारभार सोपविलेला असे. हे तिन्ही अधिकारी एकाच दर्जाचे असून कोणताही निर्णय घेताना तिघांचीही संमती आवश्यक मानली जात असे. गडावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असत. हे सर्व अधिकारी पगारी होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी लढाऊ शिबंदी ठेवली जात असे. याशिवाय किल्ल्याच्या कामासाठी व किल्ल्यावरील लोकांच्या सोयीसाठी सुतार, लोहार, पाथरवट, चांभार, रसायनवैद्य, शस्त्रवैद्य, ज्योतिषी इ. लोक नेमलेले असत. परंतु गरजेपेक्षा अधिक माणसे किंवा बाजारबुणगे किल्ल्यावर ठेवायचे नाहीत अशी शिवाजीची सक्त सूचना होती. आरमार आज्ञापत्रामध्ये अमात्यांनी आरमाराविषयी स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे. ‘ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ अशा मोजक्या शब्दात अमात्यांनी आरमाराचे महत्त्व विशद केले आहे. इ.स. १६५९ मध्ये शिवाजीने आरमाराचा पाया घातला. भिवंडी, कल्याण व पनवेल या ठिकाणी लढाऊ जहाजे बांधली १६६५ मध्ये शिवाजीजवळ ८५ लहान व ३ मोठी गलबते होती. नंतर ५ वर्षात महाराजांनी आरमारी सामर्थ्य एवढे वाढवले की १६७० मध्ये महाराजांच्या आरमारात १६० जहाजे असल्याचा उल्लेख सापडतो. सभासदांच्या माहितीप्रमाणे महाराजांच्या आरमारात ४०० जहाजे होती. दर्यासारंग आणि मायनाक या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दोनशे जहाजांचे आरमार होते. आरमाराचे सुभे केलेले असून प्रत्येक सुभ्यामध्ये पाच गुराबा व पंधरा गलबते असत. महाराजांचे आरमारी सामर्थ्य एवढे वाढले की, पोर्तुगीजांना, इंग्रजांना आणि सिद्दींना या आरमाराची भीती वाटू लागली होती. ‘समुद्रामध्ये शिवरायाच्या कार्याचे स्वरूप ११३