भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 38, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 38

५. बलाढ्य शत्रूवर मात जून १६६० मध्ये शिवाजी पन्हाळ्यावर अडकला असल्याचे पाहून मुघल सुभेदार शायिस्तेखान याने शिवाजीच्या प्रदेशावर स्वारी काढली नगरहून पुण्याच्या रोखाने येत असतांना त्याने अनेक गावे बेचिराख केली. पुरंधर किल्ल्याला वेढा घातला पण तो किल्ला त्याला जिंकता आला नाही. त्यानंतर शिवाजीची राजधानी राजगड या किल्ल्यालाही वेढा घालण्याचा त्याचा विचार होता. पण वेढा न घातला जवळपासचा प्रदेश बेचिराख करून त्याने दहशत निर्माण केली आणि तेथून तो पुणे शहरात आला व तेथे तळ ठोकला. दिल्लीहून औरंगजेबाचा तगादा आल्यानंतर शायिस्तेखानाने एक छोटी स्वारी काढली. पुणे-जुन्नर रस्त्यावर असलेल्या चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला. तेथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने मोठ्या हिकमतीने किल्ला लढविला. चाकणचा किल्ला भूईकोट असून आकाराने लहान आहे. तरीपण जवळजवळ दोन महिने वेढा देऊनही शायिस्तेखानाला किल्ला जिंकता आला नाही. अखेर १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ल्याच्या तटाला सुरुंग लाऊन शायिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकून घेतला आणि पुण्यास परतून शिवाजीच्या राहत्या वाड्यात-लाल महालात-मुक्काम ठोकला. उंबरखिंड शायिस्तेखान चाकणच्या विजयामुळे मोठ्या आनंदात होता. त्याचा हा आनंद आणखी एका कारणामुळे वृध्दिंगत झाला. मुघल सरदार कारतलबखान यास शायिस्तेखानाने मराठवाड्यातील परिंडा हा किल्ला जिंकण्यासाठी पाठविले होते. नोव्हेंबर १६६० मध्ये कारतलबखानाने परिंडा जिंकून घेतला आणि मोठ्या दिमाखाने हा विजय मिळवून तो शायिस्तेखानाकडे आला. पुणे परिसरात प्रभाव वाढविल्यानंतर शायिस्तेखानाची नजर कोकण भागाकडे वळेल याची शिवाजीला खात्री होती आणि म्हणून कोकणच्या रक्षणासाठी शिवाजीने मोक्याच्या मार्गावर संरक्षण यंत्रणा उभारल्या. कारतलबखान परतल्यावर ३२