भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 39, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 39

शायिस्तेखानाने त्याची पाठ थोपटली आणि त्याला कोकणच्या मोहिमेवर पाठविले. त्याच्या समवेत चव्हाण, गाडे, कोकाटे, जाधव इ. मराठे सरदार तसेच माहूरची देशमुख स्त्री रायबागीण हीदेखील कारतलबखानाच्या स्वारीमध्ये सामील झाली. पराक्रमी स्त्री म्हणून रायबागीणचा नावलौकीक होता. कारतलबखानाने घाटमाथा ओलांडून तळकोकणाकडे जाण्यासाठी नेहमीचा हमरस्ता स्वीकारला. या मार्गावर शिवाजीचे अनेक किल्ले होते. एखाद्या किल्ल्यातून शिवाजीच्या लोकांनी प्रतिकार केला तर तो सहज जिंकून घेता येईल अशी घमेंड कारतलबखानात होती. घाटमाथ्याहून जात असतांना लोहगड, तुंग, तिकोणा इत्यादी किल्ले ओलांडून मुघल फौज पुढे गेली. परंतु मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांतून कोणताही प्रतिकार झाला नाही तेव्हा मराठे आपल्याला घाबरले असा समज करून घेऊन मोठ्या उन्मादाने कारतलबखान आंबेनळीच्या घाटापर्यंत पोहचला. आंबेनळीच्या घाटातून कोकणात उतरण्यासाठी घनदाट जंगलातून जावे लागते. या घनदाट अरण्यात मोघल फौज घुसताच चारी बाजूंनी हल्ला करण्याची योजना शिवाजीने आखली होती. या घनदाट अरण्यालाच उंबरखिंड या नावाने ओळखले जात होते. शिवभारतामध्ये परमानंदाने उंबरखिंडीच्या लढाईचे तपशिलवार वर्णन केलेले आहे. कारतलबखानाची फौज उंबरखिंडीत घुसल्यानंतर शिवाजीच्या योजनेप्रमाणे मराठ्यांनी चारी बाजूंनी एकदम हल्ला चढविला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुघलांची दाणादाण उडाली. कारतलबखान व रायबागीण दोघेही नामोहरम झाले. दोघेही शिवाजीला शरण आले. मुघल सरदाराकडून खंडण्या वसूल करून शिवाजीने सर्वांना पुण्याकडे परतवून लावले. अशाप्रकारे उंबरखिंडीच्या लढाईत मुघलांची फजिती झाली. इंग्रजांना धडा सिद्दी जौहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांनी सिद्दी जौहरला मदत केली होती. हे शल्य शिवाजीच्या मनात डाचत होते. शिवाय विशालगडाजवळ पालवणचा राजा जसवंतसिंग दळवी आणि शृंगारपूरचा राजा सुर्यराव सुर्वे ह्यांनी शिवाजीच्या मार्गात विघ्न आणले होते. त्याचा रागही शिवाजीच्या मनामध्ये होता. उंबरखिंडीची लढाई झाल्यानंतर शिवाजीने थेट दक्षिण कोकणाकडे कूच केली. संगमेश्वरच्या ठाण्यावर पिलाजी निळकंठराव आणि तानाजी मालुसरे यांना सूर्यराव सुर्वे याचा बंदोबस्त करण्यासाठी ठेवले. राजापूरला पोहचल्यानंतर शिवाजीने सर्व स्थानिक अंमलदारांकडून आणि पाश्चात्त्य व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करण्यास सुरुवात केली. इंग्रज बलाढ्य शत्रूवर मात ३३