भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 78, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 78

१०. शिवराज्याभिषेक राज्याभिषेकाचे प्रयोजन शिवाजीने स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आपल्या स्वतंत्र राज्याची कोणतीही घोषणा केली नव्हती. १६३६ मध्ये आदिलशहाची नोकरी पत्करून शहाजी जेव्हा कर्नाटकाकडे गेला त्यावेळी पुणे जहागिरीचा कारभार त्याने बालशिवाजीकडे सोपविला होता. या मूळ जहागिरीच्या आधारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीला सुरुवात केली. शिवाजीच्या जहागिरीचा म्हणजे राज्याचा विस्तार होत आहे हे पाहून आदिलशहा आणि मुघल शिवाजीच्या हेतूविषयी साशंक झाले. शिवाजी केवळ जहागिरीचा विस्तार करीत नसून स्वतंत्र राज्याचीच उभारणी करीत आहे याची खात्री १६६५ पर्यंत मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज आणि इतर वखारवाले यांना पटली. विशेषतः औरंगजेबाला शिवाजीचा हेतू धोकादायक असल्याचे लक्षात आले आणि म्हणून मिर्झाराजे जयसिंगाला पाठवून त्याने शिवाजीचे राज्यच नष्टप्राय करण्याची योजना आखली. ती यशस्वी झाली नाही, तेव्हा शिवाजीला उत्तरेत बोलावून घेऊन त्याला कैदेत टाकण्याचा डाव औरंगजेबाने साधला. पण त्यातूनही शिवाजी सहीसलामत निसटला आणि दक्षिणेत परत येऊन त्याने आपल्या राज्याचा चौफेर विस्तार केला. मुघलांसहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला. पाश्चात्त्य वखारवाल्यांना नामोहरम केले. आदिलशहा व कुतुबशहा यांना आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले. आपले राज्य आता निर्वेध झाले आहे अशी खात्री पटल्यावर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. मध्ययुगीन राज्यपद्धतीप्रमाणे वंशपरंपरा चालणारे राज्य स्थापन करणे शिवाजीला आवश्यक होते. मोठ्या चतुराईने आणि कौशल्याने, तसेच अप्रतिम पराक्रमाने, प्रसंगी जीवघेणे धाडस करून किंवा जीवाची बाजी लावून शिवाजीने स्वराज्याची उभारणी केली होती. या कार्यासाठी साधुसंतांचे आशीर्वाद मिळवून देशावरील व कोकणातील देसाई, देशमुखांचा विश्वास संपादन केला होता. त्यांनाही स्वराज्यकार्यात सहभागी करून घेतले. आपल्या राज्यातील रयतेला सुखी ७२