भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 77, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 77

यश मिळू शकले नाही. उलट मराठ्यांचे पराक्रम वाढत चालले. इ. स. १६७३ च्या ऑक्टोबर महिन्यात शिवाजीने पांडवगड जिंकून घेतला आणि तेथून थेट त्याने कारवारपर्यंत धडक मारली. शिवाजीचे हे सर्व पराक्रम ऐकून औरंगजेबाची चीड वाढत चालली. दिलेरखानावरचा त्याचा विश्वास उडाला. शाहजादा मुअज्जम कडून कोणतीच कामगिरी होत नव्हती. त्यामुळे दक्षिणेचे राजकारण हा औरंगजेबाच्या चिंतेचा विषय झाला होता. तेव्हा जानेवारी १६७३ मध्ये बहादूरखान या विश्वासू सरदारास दक्षिणेच्या मोहिमेवर औरंगजेबाने पाठविले. दिलेरखान व बहादूरखान दोघे एकत्र आले आणि मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची योजना त्यांनी मांडली. परंतु कोणत्या बाजूने आक्रमण करावे याचा निर्णयच त्यांना लवकर घेता आला नाही दरम्यान एका चकमकीत शिवाजीने मुघलांचे एक हजार सैन्य गारद केले. त्यामुळे तर बहादूरखानाचे धाबेच दणाणले. दिलेरखानाला वारंवार अपयश आलेले पाहून औरंगजेबाने त्याला उत्तरेत बोलाविले. त्यामुळे मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची जबाबदारी एकट्या बहादूरखानांवर पडली. बहादूरखान लोभी वृत्तीचा असल्यामुळे त्याला काहीतरी आमिष दाखविले की त्याच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तो गप्प बसले अशी शिवाजीची खात्री होती. आणि म्हणून, “बहादूरखान पेंडीचे गुरू आहेत, त्याचा गुमान काय?” असे मतप्रदर्शन शिवाजीने केल्याचे सभासदाने नमूद करून ठेवलेले आहे. बहलोलखानाला पराभूत केल्यानंतर शिवाजीने दिलेरखान व बहादूरखान यांचीही वाट लावली. आदिलशाही दरबार व दिल्लीचा दरबार शिवाजीच्या पराक्रमामुळे भयचकीत झाला. औरंगजेब अधिक अस्वस्थ झाला आणि विजापूरच्या खवासखानाची झोप उडाली. पोतुगिजांनी तर केव्हाच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. डच, फ्रेंच आणि इंग्रज आपला व्यापार सांभाळण्यासाठी शिवाजीला मान देऊ लागले होते. कुतुबशहाशी तर शिवाजीचे चांगले सख्य होते. जंजिऱ्याचे सिद्दी काहीतरी कुरापत काढून मराठ्यांच्या प्रदेशात घुसखोरी करीत होते. परंतु किनारी प्रदेशात शिवाजीने एवढी चोख व्यवस्था केली होती की सिद्दीही नामोहरम होऊन स्वस्थ बसले. थोडक्यात इ. स. १६७४ च्या पूर्वार्धात शिवाजीचे सर्व शत्रू नामोहरम झाले होते आणि नरमले होते. राज्याभिषेक करण्यासाठी हीच मोठी संधी आहे असा विचार करून शिवाजीने गागाभट्टाशी विचारविनिमय करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित केले. □□□ मुघलांची पिछेहाट ७१