भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 92, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 92

ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेची सांगता केली. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे एक खास वैशिष्ट्य दिसून येते. जो प्रदेश जिंकला आहे किंवा जे किल्ले जिंकले आहे त्यांची उत्तम व्यवस्था लावून दिल्याशिवाय शिवाजी महाराज पुढे जात नसत. कर्नाटक मोहिमेवर असताना जो प्रदेश आपल्या ताब्यात आला त्याची चोख व्यवस्था लावण्याचे कार्य शिवाजीने प्रथम केले. संताजी भोसले याला कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशावर सुभेदार म्हणून नेमले आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांची निवड केली जिंकलेल्या किल्ल्यांची शिवाजीने कशी व्यवस्था लावली याची माहिती मद्रासमधील समकालीन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेली आढळते. जिंजी किल्ला जिंकताना काही बुरूज कोसळले होते, तटांना खिंडारे पडली होती, परंतु महाराजांनी कारागीर लावून किल्ल्याची उत्तम डागडूजी केली. एवढेच नव्हे तर पहिल्यापेक्षा किल्ला अधिक भक्कम केला. मिशनऱ्यांनी असेही लिहून ठेवले आहे की, 'अनेक, नवे भुईकोट व डोंगरी किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले.' 'केवळ किल्ल्यांची डागडुजी आणि प्रशासन व्यवस्था एवढ्या कार्यावरच महाराज संतुष्ट राहत नाहीत. रयतेचा किंवा सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना, सैनिकांना ते सूचना देत असत, निष्पाप लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेण्यास सांगत. जानेवारी १६७८ मध्ये म्हैसूरमार्गे महाराष्ट्राकडे परत येताना बेळगाव जिल्ह्यात महाराजांनी प्रवेश केला. तेथून संपगावमार्गे पुढे जात असताना बेलवाडी येथील सावित्रीबाई देसाई हिने शिवाजीविरुद्ध युद्ध पुकारले. ही देसाई स्त्री एवढी पराक्रमी होती की बेलवाडीचा छोटासा किल्ला तिने २७ दिवस लढविला. शेवटी शिवाजीपुढे तिला माघार घ्यावी लागली. शिवाजीने या देसाई स्त्रीचे मोठे कौतुक केले. या प्रसंगाचे शिल्पांकन बेलवाडीच्या परिसरात अनेक ठिकाणी झालेले आढळते. एप्रिल १६७८ मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडांवर आले आणि तेथून मे महिन्यात रायगडावर गेले. अशाप्रकारे शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम जवळजवळ दीड वर्षे सुरू होती असे म्हणावे लागते. ही मोहीम यशस्वी झाल्याने शिवाजीचा दरारा दक्षिणेत सर्वदूर निर्माण झाला. पाश्चात्य वखारवाले अधिक सावध झाले. एका समकालीन इंग्रजीपत्रात तर ८६ छत्रपती शिवाजी महाराज