भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 93, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 93

असा उल्लेख आहे की, 'अल्पकाळातच सुरतेपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशाचा शिवाजी स्वामी होईल यात शंका वाटत नाही.' कर्नाटक मोहिमेबाबत आणखी एका इंग्रजी पत्रातील उल्लेख पहा, 'स्पेनमध्ये सिझर ज्याप्रमाणे आला, त्याने पाहिले आणि जिंकले त्याप्रमाणे कर्नाटकात शिवाजी आला, त्याने पाहिले आणि जिंकले' थोडक्यात राज्याभिषेकानंतर दक्षिण हिंदुस्थानात मोठा विस्तार करून शिवाजीने आपल्या स्वराज्याची इमारत पक्की केली. संभाजी मुघलांना मिळाला कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजीला संगमेश्वरास पाठविले होते. महाराज स्वारीहून परत येईपर्यंत तो संगमेश्वरलाच राहिला होता. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते असे समकालीन मराठी व फारसी साधनांवरून दिसून येते. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर निघण्यापूर्वीच दोघांमध्ये वितुष्ट आले असावे असे वाटते. संभाजी संगमेश्वरला स्वतःच्या इच्छेनुसार गेला होता असे दिसते. युवराज संभाजीवर शिवाजी महाराजांचा विश्वासही होता कारण कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी इंग्रज वखारवाल्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी महाराजांनी संभाजीवर सोपविली होती. साधारणपणे असे दिसून येते की, कर्नाटक मोहिम आटोपून शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले आणि तेव्हापासून त्यांचे मन संभाजीविषयी कलुषीत झाले. रायगडावर असताना प्रधानांचे आणि संभाजीचे काही कारणामुळे बिनसले होते. कदाचित कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर प्रधानांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी महाराजांजवळ संभाजीविषयी कागाळ्या केल्या असाव्यात. अर्थात अशा कागळ्यांमुळे गैरसमज करून घेण्याचा शिवाजी महाराजांचा स्वभाव नव्हता. स्वतः संभाजीच्याही काही तक्रारी होत्या. परंतु या तक्रारींना विशेष महत्त्व शिवाजी महाराजांनी दिले नाही. थोडक्यात शिवाजी आणि संभाजी यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते, हे मात्र निश्चित, कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर महाराजांनी संभाजीला सज्जनगडाकडे पाठविले तेथे समर्थ रामदासांच्या सहवासात संभाजीची चित्तवृत्ती शांत होईल असा शिवाजी महाराजांचा कयास असावा. परंतु संभाजी जेव्हा सज्जनगडाकडे गेला तेव्हा समर्थ रामदास तेथे नव्हतेच. अगोदरच उद्विग्न झालेल्या संभाजीचे सज्जनगडावर मन रमेना. संभाजीच्या या मनःस्थितीचा अंदाज मुघलसरदार दिलेरखान याला आला होता आणि म्हणून आपले हस्तक संभाजीकडे पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न दिलेरखानने चालू केला. कर्नाटक स्वारी ८७