भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 97, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 97

तर आणलीच परंतु राज्याचा विस्तार करून आदिलशहा व मुघल यांना जबरदस्त आव्हान दिले. अशा प्रकारे स्वतंत्र राज्य स्थापन करून शिवाजीने दक्षिणेत क्रांती घडवून आणली. त्याच्या नेत्रदिपक विजयामुळे इतर लहानमोठे सत्ताधीशही हादरले. विशेषतः शिवाजीच्या राज्याची सीमा समुद्रापर्यंत जाऊन भिडल्यानंतर गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्दी या दोन्ही सत्ताधिशांना चिंता वाटू लागली. पोर्तुगिजांनी गोव्याला राज्य स्थापन केले. पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. त्यांच्याजवळ समर्थ आरमार असल्यामुळे मुघलांनाही पोर्तुगिजांचा धाक वाटत होता. हज यात्रा करणाऱ्या भारतातील मुसलमानांना पोर्तुगिजांकडून परवाने घ्यावे लागत. मुघलांचे स्वतंत्र आरमार नसल्यामुळे पोर्तुगिजांशी त्यांनी नेहमीच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. जंजिऱ्याचे सिद्दी हे अत्यंत साहसी वृत्तीचे दर्यावर्दी राज्यकर्ते होते. जंजिऱ्यासारख्या अभेद्य किल्ल्यामध्ये त्यांची राजधानी होती. सिद्दी हे अत्यंत पराक्रमी व धाडसी असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरील मोक्याच्या ठिकाणी त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पोर्तुगीजांप्रमाणे सिद्दींचे आरमारही अत्यंत प्रभावशाली होते. मुघलांनी राजकारणाच्या सोयीसाठी सिद्दींशी तह करून आरमारप्रमुख म्हणून त्यांना मान्यता दिली होती. शिवाजी महाराजांनी जेव्हा आपले स्वतंत्र आरमार उभारण्यास सुरुवात केली आणि पश्चिम किनाऱ्यालगतची काही स्थळे व किल्ले ताब्यात घेतली तेव्हा सिद्दींना शिवाजीच्या राज्यविस्ताराची भिती वाटू लागली. त्यातून सिद्दी व मराठे असा संघर्ष सुरू झाला. पोर्तुगिजांनाही शिवाजीच्या हेतूविषयी नेहमीच शंका येत राहिली. प्रारंभी शिवाजीचे आरमार उभे करण्यासाठी पोर्तुगिजांनी त्याला तंत्रज्ञ पुरविले पण ज्यावेळी शिवाजीचे आरमार तुल्यबळ होत आहे हे लक्षात आल्यावर आपल्या तंत्रज्ञांना पोर्तुगिजांनी माघारी बोलावून घेतले. त्यांनी वरकरणी शिवाजीशी सलोख्याचे संबंध जरी जोडले होते तरी अंतर्यामी शिवाजीविरुद्ध त्यांच्या कारवाया चालू होत्या अशाप्रकारे पश्चिम किनाऱ्यावर सिद्दी व पोर्तुगीज हे दोन सत्ताधीश शिवाजीचे शत्रू होते. युरोपात प्रबोधनाचे युग अवतरल्यानंतर विशेषतः नव्या समुद्रमार्गांचा शोध लागल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांमध्ये भारताबरोबर व्यापारी संबंध जोडण्याची ईर्ष्या निर्माण झाली. पोर्तुगीजही प्रथम व्यापारासाठीच भारतात आले. त्यानंतर डच, इंग्रज व फ्रेंच यांनीही भारताशी व्यापारी संबंध जुळवून भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर मोक्याच्या ठिकाणी व्यापारी वखारी प्रस्थापित केल्या. आपला व्यापार सुरळीत आणि सुरक्षित राखण्यासाठी पाश्चात्य वखारवाल्यांनी सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९१