भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 99, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 99

त्यामध्ये फतेखानाने आपली योजना स्थगित केली. १६६० मध्ये सिद्दी जोहरने शिवाजी पन्हाळ्याच्या किल्ल्यात असतांना जबरदस्त वेढा घालून त्याची नाकेबंदी केली. ती संधी साधून फतेखानाने शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. काय सावंत हा मराठा सरदार सिद्दी फतेखानाच्या मदतीस आला. परंतु शिवाजीच्या वतीने बाजी पासलकर याने पराक्रमाची शर्थ केली. सिद्दी फतेखानाचा डाव उधळून लावला. काय सावंत या लढाईत मारला गेला तर बाजी पासलकरने विजय मिळविण्यासाठी प्राणाची आहुती दिली. शेवटी मराठ्यांच्या प्रखर प्रतिकारापुढे फतेखानाला माघार घ्यावी लागली. या पहिल्या संघर्षानंतर सिद्दी आणि मराठे यांच्यामधील वैमनस्य वाढत चालले. कोकणामध्ये दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून लहान मोठ्या चकमकी घडू लागल्या. या चकमकीचे उल्लेख बखरीमधून आणि समकालीन साधनांमधून आढळत जरी असले तरी याचा नेमका कालखंड समजू शकत नाही. सिद्दीचे उपद्व्याप वाढल्यानंतर शिवाजीने रघुनाथपंथ बल्लाळ यांना कोकणामध्ये पाठविले. त्यांनी कोकणातील मोक्याचे किल्ले घेऊन दंडाराजपुरीवर वर्चस्व निर्माण केले आणि तेथून जंजिऱ्याच्या किल्ल्यावर तोफांचा भडीमार सुरू केला. तेव्हा सिद्दी शरण आले आणि त्यांनी पंताबरोबर तह केला. हा तह नेमका केव्हा झाला आणि तहाचा तपशील काय होता याची माहिती मिळू शकत नाही. हा तह झाल्यावर काही काळ सिद्दीकडून मराठ्यांना कोणताच उपद्रव झाला नाही. परंतु लवकरच सिद्दींनी आपले सामर्थ्य एकवटले. दरम्यान रघुनाथ बल्लाळाचा मृत्यू झाल्यामुळे कोकणातल्या प्रदेशावर मराठ्यांची पकड काही प्रमाणात सैल झाली. त्याचा फायदा घेऊन सिद्दींनी मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले सुरू केले. सिद्दींचा वाढता उपद्रव पाहून शिवाजीने व्यंकोजी दत्तो याला सिद्दींचे पारिपत्य करण्यास पाठविले. कोकणात शिरून व्यंकोजी दत्तोने सिद्दींबरोबर युद्ध सुरू केले. या युद्धात अनेक हबशी मारले गेले. खुद्द व्यंकोजी दत्तोने पराक्रमाची शर्थ केली. युद्धात त्याला अनेक जखमा झाल्या. सिद्दींनी शेवटी माघार घेऊन तहाची बोलणी सुरू केली. परंतु सिद्दींची कायमची खोडकी मोडल्याशिवाय तह करावयाचा नाही असा निर्धार महाराजांनी केला होता. सिद्दींचे मुख्य केंद्र म्हणजे जंजिरा, हा किल्ला जिंकून घेतल्यावर सिद्दींचे सामर्थ्य पूर्णतः खच्ची होईल अशी शिवाजीची खात्री होती. म्हणून सिद्दीशी पहिला संघर्ष झाला तेव्हापासून जंजिरा जिंकण्याचे शिवाजीचे प्रयत्न चालू होते. आग्र्याहून परत आल्यानंतर सिद्दींचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीने कोकणात हालचाली सुरु केल्या. १६६९च्या पावसाळ्याच्या प्रारंभी दंडाराजपूरी हे ठिकाण सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९३