भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 100, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 100

मराठ्यांनी वर्चस्वाखाली आणले आणि तेथून जंजिऱ्यावर हल्ला करण्याची तयारी केली. ऑक्टोबर १६६९ मध्ये मराठ्यांनी सिद्दींची रसद तोडून अक्षरशः कोंडी केली. सिद्दीच्या सैनिकांची उपासमार सुरू झाली. तरीपण सिद्दींनी माघार घेतली नाही उलट मुघलांकडून शिवाजीवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मध्येच सिद्दी प्रमुखाने एक शक्कल लढविली. मुंबईकर इंग्रजांनी दंडाराजपूरी विकत घ्यावी म्हणून त्याने निकराचे प्रयत्न केले. पण शिवाजीशी वैर करण्याची अजिबात इच्छा नसल्याने इंग्रजांनी सिद्दी प्रमुखांच्या या प्रस्तावास मान्यता दिली नाही. मुघल आणि आदिलशहा या दोघांकडूनही सिद्दींना मदत मिळेनासी झाली. अशाप्रकारे सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर सिद्दी प्रमुख फतेखान याने जंजिरा किल्ला शिवाजीच्या ताब्यात देण्याचा निश्चय केला. त्याने तहाची बोलणी सुरू केली. जंजिरा किल्ल्याच्या मोबदल्यात मोठी जहागिरी देण्याचे शिवाजीने आमिष दाखविले. परंतु जंजिऱ्यातच अंतर्गत वाद निर्माण होऊन फतेखानाविरुद्ध बंड झाले. फतेखान शिवाजीबरोबर तह करीत आहे ही कल्पना तीन प्रमुख सिद्दी सरदारांना अजिबात मान्य नव्हती. हे तीन सरदार म्हणजे सिद्दी संबूळ, सिद्दी कासीम आणि सिद्दी खैरियात. या तिन्ही सरदारांनी फतेखानाला विरोध तर केलाच, पण त्याला कैद करून जंजिऱ्याची सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. सिद्दी संबूळ हा जंजिऱ्याचा प्रमुख झाला. मुघल सरदार औरंगजेबानेही त्याला तातडीने मान्यता दिली आणि शिवाजी विरुद्ध मदत करण्याचे आश्वासन दिले. जंजिऱ्याची पूर्ण सत्ता हाती आल्यावर आक्रमक धोरण स्वीकारून दंडाराजपूरी मराठ्यांकडून परत घेण्याचा सिद्दी संबूळने निश्चय केला. फेब्रुवारी १६७१ मध्ये दंडाराजपुरी येथे होळीचा उत्सव चालू होता. या उत्सवामध्ये मराठे दंग होते. ही संधी साधून सिद्दी संबूळ याने दंडाराजपुरीवर हल्ला करण्याचे ठरविले. सिद्दी खैरियत जमिनीच्या मार्गाने तर सिद्दी कासीम समुद्रमार्गाने दंडाराजपुरी किल्ल्याजवळ पोहचले. मराठे बेसावध असताना त्यांनी अचानकपणे हल्ला केला. मराठ्यांनी आपला बचाव करण्याचा शर्थीने प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. शेवटी दंडाराजपुरी सिद्दींनी ताब्यात घेतली. दंडाराजपुरी सिद्दींकडे गेल्यामुळे जंजिऱ्यावर हल्ला करण्याची कल्पना काही काळ शिवाजीला सोडून द्यावी लागली. सिद्दींनी दंडाराजपुरी घेतल्यावर औरंगजेबाने सढळ हाताने सिद्दींना मदत सुरू केली. त्यांचे आरमारी सामर्थ्य वाढावे म्हणून ३६ जहाजे दिली. या सुमारास मराठ्यांचेही आरमारी सामर्थ्य वाढू लागले. सिद्दी संबूळने मराठ्यांच्या आरमारावर हल्ले सुरू केले. त्यातून ९४ छत्रपती शिवाजी महाराज