छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
तुळजाभवानीचे मंदिर बांधले दक्षिणेच्या. स्वारीत जिंजीच्या शिवमंदिराची पुनर्स्थापना केली. तेथील दीपोत्सव सुरू केला. शिवाजी महाराजांनी अनेक साधुसंतांना वर्षासने दिलेली आढळतात. चिंचवडचे मोरया गोसावी, पारगावचे मौनीबुवा, केळशीचे बाबा याकुत या सत्पुरुषांवर महाराजांची श्रद्धा होती. संत तुकारामाचाही महाराजांना आदर होता. समर्थ रामदार स्वामीविषयी त्यांच्या मनात विलक्षण श्रद्धा होती. म्हणूनच युवराज संभाजीला युवराज संभाजीला सज्जनगडावर पाठविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे कार्य परस्परपूरक होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कार्यासाठी मावळ भागातील सर्वसामान्य लोकांना प्रेरित केले, त्यांना स्वातंत्र्याचा मंत्र सांगितला आणि त्यांचा स्वाभिमान जागृत केला. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे जीवनाविषयी व देशकार्याविषयी उदासीन झालेल्या जनतेला रामदास स्वामींनी क्षत्रियांची कर्तव्ये सांगितली आणि प्रपंचाचा अर्थ समजावून सांगितला. बलोपासना आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी समर्थांनी सामान्य लोकांना प्रेरणा दिली, मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि आखाडे स्थापन करण्यास उद्युक्त केले. शिवाजीच्या धार्मिक धोरणाचा एक विशेष म्हणजे अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता त्यांना मान्य नव्हती. शहाजीच्या मृत्यूनंतर जिजाबाई जेव्हा सती जाण्याची तयारी करू लागली तेव्हा महाराजांनी तिला त्या विचारापासून परावृत्त केले. परधर्मात गेलेल्या स्वकीयांना शुद्धीकरण करून पुन्हा आपल्या धर्मात सामावून घेण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच पुरोगामी होती. शिवाजी महाराजांवर रागावून नेताजी पालकर मुघलांकडे गेला होता. औरंगजेबाने त्याचे धर्मांतर करून त्याला मुसलमान केले आणि मुघलातर्फे लढण्यासाठी काबुलच्या सरहद्दीवर पाठविले. काही वर्षांनी नेताजी पालकरला पश्चात्ताप झाला आणि तो शिवाजी महाराजांकडे परत आला. महाराजांनी उदारपणे क्षमा केली. एवढेच नव्हे तर त्याचे शुद्धीकरण करून त्याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतले. मुघलाकडे बरीच वर्षे असलेला आणि मुसलमान बनून मुघलांतर्फे काबूलकडे लढणारा हा पराक्रमी पुरुष आपल्याकडे विश्वासाने परत आला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला पुन्हा स्वराज्य कार्यात सामावून घेतले. शुद्धीकरणाची शिवाजी महाराजांनी सुरू केलेली परंपरा भावी काळातील छत्रपतींनी चालू ठेवली याचे पुरावे इतिहासामध्ये मिळतात. संस्कृती रक्षणाचे आणि आत्मसन्मान वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही शिवाजी महाराजांनी केलेले आढळते. तत्कालीन मराठी भाषेमध्ये, विशेषतः राजकीय पत्रव्यवहारामध्ये फारसी शब्दांचा भरणा एवढा वाढला होता की मराठी ११८ छत्रपती शिवाजी महाराज
भाषा झाकाळून गेली होती. भाषेचे शुद्धीकरण करण्यासाठी रघुनाथ पंडिताकडून 'राज्यव्यवहारकोश' महाराजांनी तयार करवून घेतला. राज्याभिषेकापासून नवीन कालगणना सुरू केली. व्याकरण, ज्योतिष या विषयावरील ग्रंथ लिहून घेतले. जातीजातीमधील तंटेबखेडे दूर करण्यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केलेले आढळतात. ब्राह्मण आणि प्रभू या दोन उच्च जातींमध्ये वर्षानुवर्षे कलह चाललेला होता. शिवाजी महाराजांनी गागाभट्टाच्या सहाय्याने तो कलह दूर केला आणि या दोन्ही जातीत सामंजस्य निर्माण केले. गुलामगिरीची प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा महाराजांनी प्रयत्न केलेले आढळतात. न्याय व्यवस्था न्यायव्यवस्थेबाबत शिवाजी महाराजांनी पंचायतपद्धतीच्या न्यायव्यवस्थेला प्राधान्य दिलेले आढळते. पंचायतपद्धती ही परंपरागत न्यायपद्धती होती. रूढीपरंपरेप्रमाणे चालत आलेले कायदे आणि प्रत्येक जातीनिहाय रूढ असलेले कायदे यांचा विचार करून गावपंचायत न्यायदान करीत असे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दगाबाजी करणे किंवा शत्रुपक्षाला जाऊन मिळणे यांची चौकशी करण्याचे काम सुभेदाराकडे किंवा देशाधिकाऱ्याकडे असे शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळाकडे न्यायाधीश हा एक प्रधान होता. स्वराज्यातील न्यायदानाची जबाबदारी न्यायाधीश या प्रधानावर असे. अत्यंत महत्त्वाचे खटले प्रत्यक्ष महाराजांसमोर चालत असत. गोतसभेचे काही निवाडे महाराजांच्या उपस्थितीत झालेले आढळतात. धर्मविषयक खटले पंडीतराव या प्रधानापुढे चालत असत. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील ब्रह्मवृंद त्या त्या भागातील धर्मविषयक न्यायनिवाडे करीत असत. नैतिक गुन्ह्याविषयी स्वतः महाराज अत्यंत संवेदनशील होते. स्वराज्याची स्थापन केली त्या सुमारास एका गावच्या पाटलाने व्याभिचार केल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याचा एक हात व एक पाय तोडून महाराजांनी कडक शिक्षा केली होती. स्वराज्याशी बेइमान होणाऱ्या अधिकाऱ्यांना ते कडक शासन करीत असत. अफजलप्रकरणी खंडोजी खोपडे या देशमुखाचे हातपाय तोडून त्यांनी बेइमानीचे फळ दिले होते. स्वराज्यातील स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी शत्रुपक्षातील स्त्रियांना आणि मुलांना जर कोणी पकडून आणले तर त्यांनाही महाराज शिक्षा करीत असत आणि साडी चोळीचा सन्मान देऊन स्त्रियांना परत पाठवीत असत. खाफीखान लिहितो की, 'शत्रू पक्षाकडील स्त्री सैनिकांनी पकडून आणली तर त्या स्त्रीचा सन्मान करून महाराज तिला तिच्या नातलगांकडे पाठवून देत असत. शिवरायाच्या कार्याचे स्वरूप ११९
नुतन सृष्टीचा जनक केवळ ३०-३५ वर्षांच्या काळात स्वराज्याची स्थापना करून त्याचा चौफेर विस्तार करण्याचे अलौकीक कार्य शिवाजी महाराजांनी केले. शेकडो वर्षे पारतंत्र्याच्या मगरमिठीत सापडलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. अस्मिता जागृत केली. स्वाभिमान शिकविला आणि नवा महाराष्ट्र उभा केला. केवळ स्वतंत्र राज्य स्थापन करणे एवढेच शिवाजी महाराजांचे ध्येय नव्हते तर राज्यातील सर्व सामान्य जनता सुखी झाली पाहिजे हे त्यांच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते. सामान्य जनतेला काडीचाही उपसर्ग पोहचू नये, शेतकऱ्यांची दैन्यावस्था संपली पाहिजे, स्वराज्यातील व्यापार समृद्ध झाला पाहिजे, साधुसंतांना निर्भयपणे उपासना करता आली पाहिजे, सर्व जातींना संरक्षण मिळाले पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान राखला गेला पाहिजे असे कितीतरी पैलू शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये होते. विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धिस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरूष होते असे म्हणणे सार्थ ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपात पहात होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे 'महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली.' समारोप “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, न्यायदानात निःस्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली, पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले, सर्व धर्मांना समान लेखले, साधुसंतांचा यथोचित आदर केला, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरूष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरूष होता.” ❑❑❑ १२० छत्रपती शिवाजी महाराज
नाव : प्रल्हाद नरहर देशपांडे जन्मस्थळ : पंढरपूर (जि. सोलापूर) जन्मतारीख : १७ सप्टेंबर १९३६ शिक्षण : एम्.ए.पीएच.डी. अध्यापन काळ : १९६९-१९९६, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे पीएच.डी. : पाच विद्यार्थी पीएच.डी. उत्तीर्ण मार्गदर्शक माजी अध्यक्ष : अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद व संस्थापक सदस्य अध्यक्ष व : खानदेश इतिहास परिषद, भारतीय विद्या प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष : अ. म. इतिहास परिषदेचे यवतमाळ अधिवेशन, १९९९ समिती सदस्य : पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यशवंतराव (भूतपूर्व) चव्हाण मुक्त विद्यापीठ, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य तंजावर पेपर्स कमिटी इत्यादी मुख्य चिटणीस : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे इतिहास विषयक : १४ ग्रंथ महत्त्वाचे ग्रंथ : (१) शिवाजी महाराजांची पत्रे (२) महाराष्ट्र संस्कृती (३) मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष कथासंग्रह : २ अनेक शोधनिबंध, ललित साहित्य प्रकाशित. संपादक : 'संशोधक' त्रैमासिक (२२ वर्षांपासून संपादन) या त्रैमासिकाला महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार मिळाला. 'राजगड' आणि 'रायगड' ही दोन पुस्तके महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून प्रकाशित. RAJA BADSAL