दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 35, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें९० उपोद्घात. बारावें वैराग्य तेरावा विवेक । चौदावा तो लोक राजी राखे ॥ ५ ॥ पंध्रावें लक्षण तें राजकारण । सोळावें तें जाण अवेगता ॥ ६ ॥ प्रसंग जाणावा हां गुण सत्रावा । काळ समजावा सर्वांठायीं ॥ ७ ॥ आठ्रावें लक्षण वृत्ती उदासीन । लोलंगता जाण तेथें नाहीं ॥ ८ ॥ येकोणीसावें चिन्ह सर्वांसी समान । राखे समाधान ज्याचें त्याचें ॥९॥ विसावें लक्षण रामउपासना । वेध लावी जना भक्तिरंगें ॥ १० ॥ हरिकथानिरूपण, राजकारण व सावधपण हीं जीं रामदासी सांप्रदायाचीं तीन प्रमुख अंगें त्यांचीं एकंदर २० लक्षणें समर्थांनीं वरील कवितेंत सांगितलीं आहेत. त्यांचें मनन करून तीं आपल्या अंगीं बाणण्याचा प्रयत्न करणारास प्रपंच व परमार्थ यांचा उत्कृष्ट प्रकारें लाभ होतो,’ असें समर्थांचें अनुभवजन्य वचन आहे. त्याकडे प्रस्तुतकालीन महाराष्ट्राचें लक्ष वेधावें अशी सदाशा प्रगट करून लेखणी खालीं ठेवतॉ.