भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 399, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 399

३६४ श्रीदासबोध. [ दशक विकारलें । उदंडाचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥ पोकळीमध्यें गंधर्व- नगरें । नाना रंग लहान थोरें । बहुत व्यक्ति बहु प्रकारें । कैशीं निवडावीं ॥२३॥ दिवसरजनीचा प्रकार । चांदणें आणि अंधकार । विचार आणि अविचार । कैसा निवडावा ॥२४॥ विसर आणि आठवण । नेमस्त आणि बाष्कळपण । प्रचीत आणि अनुमान । येणें रीती ॥ २५ ॥ न्याय आणि अन्याय । होय आणि न होय । विवेकेंविण काय । उमजों जाणे ॥ २६ ॥ कार्यकर्ता आणि निकामी । शूर आणि कुकर्मी । धार्मिक आणि अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥ धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तस्कर । खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥ वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ । सारासारविचार स्पष्ट । कळला पाहिजे ॥२९॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके उपासननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. गुणभूत. श्रीगणेशाय नमः ॥ पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग । पंचभूतें गेलिया मग । काय आहे ॥ १ ॥ श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमै वाढविले । आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥ अंतरात्मा पां- चवें भूत । त्रिगुण त्याचे अंगभूत । सावध करूनियां चित्त । बरें पाहा ॥ ३ ॥ भूत म्हणिजे जितुकें झालें । त्रिगुण झाल्यांत आले । इतुकैन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥ भूतांवेंगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्वही । एका वेगळें एक कांहीं । घडेचि ना ॥ ५ ॥ आत्म्याचेनि झाला पवन । पवनाचेनि प्रगटे अन । अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥ जीवन अवघें दबाबिलें । तें रविमंडळें आळलें । वन्हिवायूचेनि झालें । भूमंडळ ॥ ७ ॥ वन्हि वायु रवि नसतां । तरी होती उदंड शीतळता । ते शीतळते- मध्यें उष्णता । येणेंचि न्यायें ॥८॥ अवघें वर्मास वर्म केलें । तरीच एवढें फांपावलें । देहमात्र तितुके झाले । वर्माकरितां ॥ ९॥ अवघें शीतळचि असतें । तरी प्राणिमात्र मरोनि जाते । अवघ्या उष्णेचि करपतें । सकळ १. आकाशांत भासमान् होणारें नगर. २. भूतापासून झालेलें. ३. भरलें.