दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 399, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३६४ श्रीदासबोध. [ दशक विकारलें । उदंडाचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥ पोकळीमध्यें गंधर्व- नगरें । नाना रंग लहान थोरें । बहुत व्यक्ति बहु प्रकारें । कैशीं निवडावीं ॥२३॥ दिवसरजनीचा प्रकार । चांदणें आणि अंधकार । विचार आणि अविचार । कैसा निवडावा ॥२४॥ विसर आणि आठवण । नेमस्त आणि बाष्कळपण । प्रचीत आणि अनुमान । येणें रीती ॥ २५ ॥ न्याय आणि अन्याय । होय आणि न होय । विवेकेंविण काय । उमजों जाणे ॥ २६ ॥ कार्यकर्ता आणि निकामी । शूर आणि कुकर्मी । धार्मिक आणि अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥ धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तस्कर । खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥ वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ । सारासारविचार स्पष्ट । कळला पाहिजे ॥२९॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके उपासननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. गुणभूत. श्रीगणेशाय नमः ॥ पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग । पंचभूतें गेलिया मग । काय आहे ॥ १ ॥ श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमै वाढविले । आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥ अंतरात्मा पां- चवें भूत । त्रिगुण त्याचे अंगभूत । सावध करूनियां चित्त । बरें पाहा ॥ ३ ॥ भूत म्हणिजे जितुकें झालें । त्रिगुण झाल्यांत आले । इतुकैन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥ भूतांवेंगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्वही । एका वेगळें एक कांहीं । घडेचि ना ॥ ५ ॥ आत्म्याचेनि झाला पवन । पवनाचेनि प्रगटे अन । अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥ जीवन अवघें दबाबिलें । तें रविमंडळें आळलें । वन्हिवायूचेनि झालें । भूमंडळ ॥ ७ ॥ वन्हि वायु रवि नसतां । तरी होती उदंड शीतळता । ते शीतळते- मध्यें उष्णता । येणेंचि न्यायें ॥८॥ अवघें वर्मास वर्म केलें । तरीच एवढें फांपावलें । देहमात्र तितुके झाले । वर्माकरितां ॥ ९॥ अवघें शीतळचि असतें । तरी प्राणिमात्र मरोनि जाते । अवघ्या उष्णेचि करपतें । सकळ १. आकाशांत भासमान् होणारें नगर. २. भूतापासून झालेलें. ३. भरलें.