भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 192, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 192

१५८ सार्थ तुकारामगाथा चालती स्थिर स्थिर । गरुड टक्याचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥ ३ ॥ मिळालिया भद्रजाती । कैसा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥ ४ ॥ नामामृत कल्लोळ । वृंदें फोडली सकळ । आले वैष्णवदळ । कलिकाल कांपती ॥ ५ ॥ आस करिती ब्रह्मादिक । देखुनि वाळवंटींचे सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे फँसे ॥ ६ ॥ मरण मुक्ति वाराणसी । पितृऋण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोवाच्या ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां । काय करणे आम्हा चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :- घुमरी-विपुल, पुष्कळ, गरुड टक्याचे-गरुड अग्रभागी असणाऱ्या निशाणाचे, श्रुति-वीणा, भद्रजाती-सुलक्षणी हत्ती, वृंदें-समुदाय, नासी-नाश करते, नुपेक्षी-उपेक्षा करीत नाही अर्थ. - चला, कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपुरात जाऊन दोन्ही डोळ्यांनी पाहू या पंढरीचे वैकुंठ अगदी जवळच आले आहे १ येथे हरिनामाचे पीक विपुल प्रमाणात आले असून प्रभुप्रेम आकाशात मावेनासे झाले आहे प्रभुप्रेमाने सर्व पंढरी सामावून गेली आहे घरोघरी प्रेमाचा सुकाळच झाला आहे २ वैष्णवाचे गट जागजागी स्थिर होऊन चालत आहेत. त्यांच्या निशाणावर गरुडाची खूण आहे नामघोषाचा गजर त्यानी चालविला आहे टाळ, वीणा, मृदंग यांची साथ त्याला मिळत आहे ३ सुलक्षणी हत्ती जसे डुलत डुलत चालतात तसे हे वैष्णववीर आनंदाने डुलत डुलत नामघोषाच्या नादात चालले आहेत एकापेक्षा एक शूर असे हे वैष्णववीर भगवद्भक्तीचा उठाव करीत आहेत ४ हरीच्या नामामृताचा कल्लोळ चालला असून सर्वत्र वैष्णवांचे समुदाय वाटून आले आहेत या वैष्णववीरांच्या समुदायापुढे प्रत्यक्ष यमही थरथर कापत उभा राहतो. ५ पंढरपूरच्या या वाळवंटाचे सुख पाहून त्याची इच्छा प्रत्यक्ष ब्रह्मदेवही करीत आहेत या मृत्युलोकाचे भाग्य केवढे थोर ! धन्य धन्य या मृत्युलोकाची ! असे उद्गारही ते काढतात ६ काशीला मुक्ती मिळते पण तेथे मरण यावे लागते गयेस गेल्यानंतर पितृऋणातून मुक्त होता येते पंढरपुरात मात्र या गोष्टी उधारीवर नसतात विठ्ठलाच्या पायाशी याचा लाभ त्वरित होत असतो ७ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता चिंता कशासाठी करावी ? सर्व सिद्धीस देणारा तो दाता पांडुरंग समर्थ असा असून तो आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही ८ विवरण - भागवत संप्रदायात आषाढी व कार्तिकी एकादशीचे माहात्म्य फार सांगितले गेले आहे या दोन्ही प्रसंगी पंढरपूर येथे यात्रा भरत असून विठ्ठलाच्या गजराने अवघे वाळवंट दुमदुमून जाते उभ्या महाराष्ट्रा- तील भक्तगण खांद्यावर गरुडपताका घेऊन यात्रेस येत असतात निरनिराळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्याही येतात टाळ, मृदुंग, वीणा, हरिभजन यांनी सारे वातावरण पवित्र होऊन जाते या एका अभंगात तुकारामबुवा मुख्यत कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याचे वर्णन करीत आहेत आषाढी एकादशीएवढेच कार्तिकी एकादशीचेही महत्व वार- करी संप्रदायात असते ही एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून प्रसिद्ध असून चातुर्मासात भगवान शेषशय्येवर शयन करीत असतात पण या एकादशीस त्यांना जागे करण्यासाठी स्तोत्रपाठ, भजन, पूजन, काकडआरती, गायन, वादन इत्यादींच्या साहाय्याने स्तवन केले जाते ‘उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रा जगत्पते। त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेदिदम्’ यासारख्या मंत्राने परमेश्वराची प्रार्थनाही केली जाते पंढरपूर येथील सोहळा याही एकादशीला अवर्णनीय असतो