सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 245, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंभरवसा काय आतां । कोण आणि अयचिता । तैसीच जाली कीर्ति । तया मज बहुतां । म्हणउनि मारीं हाका । सोयी पावे पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळु दाता ॥ ५ ॥ संचित सांडवलें । कांहीं होतें जबळीं । वित्त गोत पुत भाया । तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सघोभायीं- संसार व तू यात, ठाव-मूळ ठिकाण, वित्त-संपत्ती, गोत-नातेवाईक, पुत-पुत्र, लागावळी-मायेचा सबंध. अर्थ:- हा काहो माझा देश या येय नसूनही मी या ठिकाणी फिरत फिरत आलो आहे. मी आता कुणावर सत्ता करावी ? मी स्थिर कुठे राहिलो आहे ? माझ्या पायांनी व डोळ्यांनी तर मला सोडूनच दिले आहे असा मी आंधळा, पांगळा या परदेशी असून मला कुणीही प्रेमाचे नाही. १ देवा, आता माझी चिंता तूच करावीस तुझ्या कृपेचे दान द्यावेस. मागेपुढे राहून कुणी साभाळणारे मला नाही; म्हणून तू मला आता या साधुसंतांच्या हाती सोपीव २ याउ चालत असताना मला फार भय बाटले. कारण या वाटेने पुष्कळ लोक गेले; पण ते काही परत आले नाहीत. त्यांची काय गती झाली ती काही कानावर आली नाही. काही दिसलेही नाही. यामुळे संसार व तू माच्यात धित ठेवून, मनात तुला बाणवून मी बसलो आहे. ३ देवा, तुझ्या ठायीचे मूळ ठिकाण सोडल्यापासून मी तुझी करुणा भाकीत आहे. कोणत्याही एकाच गळी मी निश्चल होऊन राहिलो नाही. खूप हिंडता हिंडता थकून गेलो. चौऱ्याऐशी लक्ष गावे हिंडून हिंडून मी फार थकलो आहे देवा, आता तुझ्याकडे पाहात याच जागेवर स्थिर होण्याच्या प्रयत्नात आहे. ४ कुणीतरी अवचित मजसाठी काही घेऊन येईल असा भरवंसा मला नाही. कारण माझ्या पूर्वीच्या लोकात तशीच कीर्ती झालेली आहे. म्हणून तर देवा, तुला मी हाका मारीत आहे पुण्यवंता, माझ्यावर कृपा कर. मला फार भूक लागली आहे रे, आजि तुझ्याशिवाय कृपाळू व उदार दाता असा कुणी नाही ५ माझ्याजवळ जे काही थोडे पूर्व- कर्माचे संचित होते ते सर्व खर्च झाले. संपत्ती, नातेवाईक, पुत्र यांच्या मायेचा सबंधही संपून गेला देवा, मी आता खरोखरीच निष्काम बनलो आहे. हेच माझ्या कपाळी होते तुकाराम महाराज म्हणतात, आता तूच माझा सर्वस्वी हित करणारा प्रभू आहेस. ६ विवरण :- वरील दोन अभंग पांगळ्याचे म्हणून तुकारामबुवांनी लिहिले आहेत धडधाकट, श्रीमंत, कला- चतुर, श्रेष्ठ वर्णाची, देखणी माणसे कुणालाही प्रिय होतील पण आंधळे, लुळे, पांगळे याचा कणव कुणाला येणार ? पाप नसल्यामुळे, डोळे नसल्यामुळे अधिकच दयनीय अवस्था झाल्यावर एका पांडुरंगाखेरीज दुसरा कोणी दाता नाही अशीच या पांगळ्याची खात्री झालेली दिसते अशा पांगळ्याला कुणी सांभाळणारा नसतो, कुणी जवळ करणारा नसतो, भारी दुखे याला भोगावी लागतात, सर्वांनी त्याची उपेक्षा केलेली असते तेव्हा संताच्या सहवासात, साधूच्या संगतीत त्याच्या जीवास तेवढेच सुख होते ईश्वराकडे चित्त लागल्यामुळे तेवढीच दुःखाची जाणीव कमी होऊन या पांगळ्या-आंधळ्याची जीवितातील करुणा भक्तीस मोठी पोषक झाली. देवासही अशा माणसाचा फार लोभ कारण याना साभाळणारा हाच एक पाडुरंग असल्याची जाणीव त्यालाही आहेच या पुढचेही आंधळ्यावरील रूपकात्मक अभंग याच भूमिकेवरचे आहेत ४१५ देखत होतो आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टो गेली वरी आले पडळ । तिमिर फोडलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालो देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥