भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 262, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 262

ब्रह्मादिकासही समजत नाही २ ही सावळी विठाई अतिशय सुकुमार आहे. हिचे चार हात फारच शोभून दिसतात. हिच्या छातीचा भाग सखोल असून त्यावर तेजस्वी असे पदक चमकत आहे. हिच्या कमरेस लहान लहान घुंगरे असून ती अतिशय मधुर आवाज करतात हिच्या पायातील घागऱ्या मधुर ध्वनी करून गाणे गात असतात हिच्या पुढे नित्य संगीत, नृत्य सुरू असते. ३ हिचा अष्टाय असा सुशोभित बाघा किती वर्णन करावा ! शुद्ध केलेल्या तेजस्वी रसांचीच ही सुगंधी व सौंदर्यवान अशी मूर्तीच जणू ओतली आहे ही सर्व कलात निपुण असून हिचे मुख हसरे आहे हिचे भाषण मधुर शब्दांनी भरलेले असते. ही नारायणी, आदिशक्ती देवी विठाबाई बहुरूपानी नटलेली आहे ४ पंढरपूरसारख्या महानगरामध्ये हिची घटस्थापना केलेली आहे. आकाशाचा मंडप त्रैलोक्यावर घातलेला असून चंद्रभागेच्या तीरावर हिने गोंधळ सुरू केला आहे ही कृष्णाबाई, योगेश्वरी आपल्या भक्तजनांच्या कार्यासाठी अवतीर्ण झाली आहे ५ तेहतीस कोटी देव, चामुंडादी देवी, अष्ट भैरव या सर्वांचा समुदाय हिच्या आरतीसाठी आलेला आहे आरती ओवाळून झाल्यावर हे तिच्यावर फुलांचा वर्षाव करितात नारदतुंबर व गंधर्व गाणे गाऊन हिची स्तुती करतात. या गायनाने सर्वांना ब्रह्मानंद होत असतो अशा या देवी विठाईचे चरणरज, पायांचे धूलिकण तुळयाबंधू मस्तकी धारण करीत आहे. ६

विवरण- वरील तीन अभंगात तुकोबांनी गोंधळाच्या रूपाने विठाईमाऊलीचे अति रेखीव, लोभस व सौंदर्यपूर्ण असे वर्णन मोठ्या तन्मयतेने केले आहे गोंधळाचा सर्व थाट त्यांनी येथे उभा केलेला आहे 'गोंधळा'ची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे इष्टकार्य सफल व्हावे म्हणून सर्व देवदेवतांना आवाहन केले जाते व त्यांची स्तुती किंवा प्रार्थना गोंधळाच्या वेळी म्हटली जाते. लग्नासारखे मंगल कार्य झाल्यावरही गोंधळ घालण्याची प्रथा अजूनही महाराष्ट्रात आहे गोंधळ हा मुख्यतः देवीचा असतो गोंधळी लोकांकडून देवीप्रीत्यर्थ गाणे, नृत्य भजन, स्तुती, प्रार्थना, पोवाडे इत्यादी प्रकार गोंधळात म्हटले जातात गोंधळाची प्रथा प्राचीन काळीही असावी स्कंदपुराणात गोंडली नृत्याचा उल्लेख असून दीपिका, माळ, टाळ, शंख, मृदंग, दिवट्या, कवड्यांची माळ इत्यादी वस्तूंचाही उल्लेख तिथे आहे या गोंधळाच्या वेळी माहूरची रेणुका, कोल्हापूरची अंबाबाई, औंधची यमाई पालीचा खंडोबा, जेजुरीचा खंडोबा, शिंगणापूरचा महादेव, पंढरपूरचा विठोबा इत्यादी प्रमुख देवापासून जोकाई, उगाई, तुकाई यासारख्या लहान दैव- तांनाही पाचारण करण्यात येते 'माहूरपूरची रेणुबाई गोंधळा येई, कोल्हापूरची आंबाबाई गोंधळा येई, जेजुरीचा खंडोबा गोंधळा येई' अशी गोंधळाची सुरुवात सर्वांना परिचयाची आहे गोंधळ ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्यास आपले दैवत आल्याचे समाधान वाटत असल्यामुळे एकत्वाचे एक नमुनेदार साधन म्हणूनही गोंधळाकडे सामाजिक दृष्टीने पाहण्यासारखे आहे मराठी संतांनी 'गोंधळा'चा उपयोग रूपकाच्या आधाराने फार चांगल्या रीतीने करून घेतला आहे

ज्ञानेश्वरांनीही गोंधळावर सुरेख रचना केलेली आहे 'तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा । चौक आसनों कळस ठेविला हो करी कृपा । प्रेम चादवा वर दिधला हो करी कृपा । ज्ञानगादी दिली बैसावया हो करी कृपा । वरी बैसविली आदी माता हो करी कृपा । शुकसनकादिक गोंधळी हो करी कृपा । नाचताती प्रेमकल्लोळीं हो करी कृपा । पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा' अशा थाटाने ज्ञानेश्वरांनी या विठाई माउलीचा गोंधळ वर्णन केलेला आहे एकनाथांनी 'स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातला हो । चार वेदाचा फुलवरा बांधिला हो जीवशिव सबळ घेऊनि आनंदे नाचती हो । अठ्याऐशी सहस्र ऋषि दिवटे तिष्ठती हो । अशा शब्दात गोंधळाचे रूप उभे करून विठोबामाऊलीचे स्तवन केले आहे

४४८ शंख करिशी ज्याच्या नावे । त्यांचें तुज नाहीं ठावे । एक सांगतो एका भावें । सांपडे घरों ते जीवउनि राखें । रे विठ्ठल ॥ १ ॥ टिळे माळा करंडी सोग । धरूनि चाळविले जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥ २ ॥