भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 266, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 266

२३४ सार्थ तुकारामगाथा हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली । विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥ ४ ॥ तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ । या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शने ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सत्र-अन्नछत्राचे स्थान, पन्हे-पाणपोई, आर्त-इच्छा, न सरेसे-न संपणारे, आंबिली- नबील, नाचणीचे पीठ आंबवून केलेला पातळ पदार्थ, तराळ-सेवक, महार अर्थ - बंधुनो, मी हे अन्नाचे सत्र घाटात मार्गाने जाणाऱ्या यात्रेकरूसाठी घातले आहे ही पाणपोई त्याच्यासाठीच आहे इच्छामोजनाची इच्छा पुरविण्यासाठी हे माझे अन्नसत्र आहे. १ ज्याने येथे यावे त्याने त्याचा लाभ घ्यावा सदाशिवाच्या, महादेवाच्या कृपेने हे कधी न संपेल असे आहे. पण तुमचे पात्र मात्र चांगले व शुद्ध हवे मगल भावाने सर्वजणांनी श्रीहरीच्या नावाचा उच्चार करावा २ हे नाम काही एकटेच मुक्त असे नाही चार वेदाच्या साक्षीहून हे निराळे आहे एवढेच निरनिराळ्या मताच्या मळावर हे कुणात नाचू देत नाही हे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व महान तत्त्वापेक्षाही महान असे आहे यासाठी श्रीहरीच्या साक्षीने याचा जयजयकार करा ३ ही हरिनामाची आंबोल असून सर्व जगास पोटभर पुरेल एवढी केलेली आहे ही कल्पतरूची सावली विश्रांती देणारीच समजा ना सर्व वर्णांनी हिचे सेवन केल्यास उत्तमच आहे. चला यासाठी सर्वजण हरहर महादेव म्हणू या ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी या श्रीहरीचा दवंडी देणारा सेवक महार आहे. सर्वजणांना हाका मारून सांगत आहे, या सर्वजण. या महादेवाच्या शिखराच्या तळाचे दर्शन घेऊ चैत्राच्या पर्वकाळात या महादेवाचे दर्शन घेऊ या ५ विवरण - या अभंगातील महादेवाचा संबंध शिखर शिंगणापूरचा आहे तेथे चैत्रात मोठी यात्रा भरते महादेवास पाणी घालून अभिषेक करण्यात येतो सर्व वर्णाना ही उपासना सुलभ असल्याची घोषणा वारकरी पंथाच्या धोरणास अनुसरूनच आहे. 'अणु अगोरणीया आगळें । महदि महदा' हे शब्द कठोपनिषदातील 'अणोरणीयान्महतो महीयान्' या सूत्राशी जुळणारे आहेत 'अणुरेणा थोडरा । तुका आकाशाएवढा' असे त्यांनी दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहेच वरील दान व पुढील एक असे तीन अभंग कावडीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत या सबंधीची थोड- क्यात हकीकत अशी की तुकाराम महाराज एकदा शंभुमहादेवाच्या यात्रेस निघाले होते गंगाधरपंत मवाळ व मताजी तेली असे दोघेजण बरोबर होते सातव्या दिवशी त्यांना शंभुमहादेवाचे शिखर दिसले. पायथ्याशी शिंगणापूर क्षेत्र लागले तेथील सरोवरात त्या सर्वांनी स्नाने केली स्वयंपाक करून भोजनास बसणार, इतक्यात एक अतिथी भिक्षेकर्याच्या वेषाने तेथे आला व भोजन करून तृप्त होऊन अदृश्य झाला बुवांना वाटले, अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष कैलासपतीच भोजन करून गेला जेवण करून मग डोंगरावर जाऊन सर्वांनी शंभूचे दर्शन घेतले तुकाराम महाराजांनी महाद्वारात कीर्तन केले व त्यावेळी वरील कावडीचे अभंग प्रेमाने म्हटले पाच रात्र तेथे राहून मग त परत देहूस आले ४५२ आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळवितो देवा तया नमो ॥ १ ॥ नमो तीर्थपंथें चालती तयासी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥ २ ॥ नमो तया सत्यवचनीं विश्वास । नमो भावे दास्य गुरूचें त्यां ॥ ३ ॥ नमो तया मातापित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥ ४ ॥ नमो तया जाणे आणिकांचें सुखदुःख । राखे तान भूक तया नमो ॥ ५ ॥ परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियासि ॥ ६ ॥ तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥ ७ ॥