सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 28, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२ सार्थ तुकारामगाथा या तीन प्रकारांनी ग्रंथाचा आरंभ मंगलमय करावा असा संकेत आहे प्रेक्षक, पाठक, श्रोता वा चिंतक यांचे कल्याण व्हावे म्हणून जी प्रार्थना इष्ट देवतेची स्तवनवचनात केलेली असते ती आशीरूप मंगलाचरणाची होते इष्ट देवतेचे स्मरण व वंदन ज्यात असते ते नमस्कार्यारूप मंगलाचरण व या दोन्ही प्रकाराखेरीज केवळ वस्तुनिर्देशरूप हाही मंगला- चरणाचा एक प्रकार आहे कोणत्याही विशिष्ट देवतेचे स्मरण वा वंदन यात नसून पद्याचे आद्याक्षर अथवा आद्यपद मंगलदायक वर्णांनी युक्त असते कधी कधी या तीनही प्रकारांच्या मंगलाचरणांनी ग्रंथास प्रारंभ केलेला असतो तुकारामबुवांच्या गाथेच्या आरंभी असलेले सहा अभंगांचे मंगलाचरण मुख्यत नमस्कार्यारूपच आहे. तुकारामांनी आपले अभंग लिहून ठेविले असावेत, परंतु त्या हस्तलिखिताचा पत्ता कुणासच लागलेला नाही तुकारामांच्या काही शिष्यांनी त्यांचे पुष्कळ अभंग जतन करून ठेविले होते त्यांच्यातील अभंगाचा क्रम शक्य तो जशाचा तसा ठेवून जी गाथा उपलब्ध आहे तीत हे सहा अभंग मंगलाचरणाचे आहेत या सहाही अभंगांत तुकाराम- बुवांनी आपले आराध्य दैवत पंढरपूर येथील श्रीविठ्ठल यांचे अती सुंदर असे रूप वर्णन करून त्याच्या ठिकाणची आपली अनन्य भक्ती व्यक्त केली आहे बुवांचे बरेचसे अभंग स्फुट आहेत, म्हणजे त्यातून भक्तीची स्फुट अशी भावछटा प्रकट झाली आहे काही प्रासंगिक आहेत, आणि काहींचा अंतर्गत अशा अर्थसंधानाने गट निर्माण झालेला आहे एखादे मोठे कथानक सांगावयास वा एखाद्या मोठ्या तात्त्विक विषयाचे निरूपण करावयास बुवा सिद्ध झालेले नव्हते ज्याला ग्रंथ म्हणता येईल अशी रचना अर्थातच अभंगगाथेची नाही, त्यामुळे आरंभीचे मंगला- चरण व त्याचा संदर्भ याचा अर्थ तात्पर्यानेच ध्यानात घ्यावयास हवा कुणी तरी जवळच्या शिष्याने बुवांचे चांगले अभंग निवडून ते प्रथम मंगलाचरण म्हणून बसविले असण्याचीही शक्यता आहे आणि हे पूर्वप्रथेस शोभून दिसणारे असल्याने संप्रदायातही रूढ झाले पंढरपूरचे श्रीविठ्ठल किंवा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी साधुसंतांनी याच दैवताच्या भक्तीचा पुरस्कार देशी भाषेतून काव्यरचना करून केला श्रीविठ्ठल हे श्रीविष्णूचे वा श्रीकृष्णाचे बालरूप मानले जाते पुंडलीक महानुभींच्या काळापासून हे दैवत भक्तांच्या रक्षणासाठी भिवरा नदीच्या या चंद्रभागेच्या काठावर विटेवर स्थिर झाले आहे पुंडलीक मुनींची मातृपितृभक्ती पाहून संतुष्ट झालेले देव पंढरपुरास आले व त्यांच्या आग्रहाखातर तेथेच भक्तजनांसाठी राहिले अशी कथा आहे या विठ्ठलाचे रूपवर्णन मोठ्या प्रेमाने अनेक संतांनी विविध प्रकारांनी केले आहे बहुतेकांच्या वचनांतून एक प्रकारची समानता आहे श्रीविठ्ठल हा समचरणदृष्टीचा आहे असे सर्वांनी सांगितले आहे 'समचरणी मन माझें वेधलें', 'समचरणीं उभा चैतन्याचा गाभा', 'समपाऊलें उभा', 'तें समचरण विटेवरी', 'समचरण विटेवर। कटीं धरूनिया कर'। इत्यादी अनेक ओळींतून एकनाथांनी श्रीविठ्ठलाच्या समचरणांचे वर्णन केले आहे श्रीविठ्ठल विटेवर उभा असल्याची साक्ष तर सर्वच अभंगांतून मिळते आईबापांच्या सेवेत रममाण झालेल्या पुंडलीकाने एक वीट विठ्ठलास दिली व त्यावर उभे राहण्यास विनविले याचा कथासंदर्भ आहे या विटेचीही पुराणात कथा सापडते इंद्राचा शत्रू वृत्रासुर यास तीन तोंडे असून त्याने इंद्रपदासाठी घनघोर तपश्चर्या आरंभिली होती इंद्राने भयापोटी वृत्रासुराची तीन शिरे छेदून टाकली वृत्रासुराने इंद्रास शाप दिला की तू दिंडिरवनात वीट होऊन पडशील मग इंद्रास शोक झाल्यावर विष्णूनी त्यास अभिवचन दिले की पुंडलिकाच्या आश्रमात मी येईन तेव्हा तुझा उद्धार करीन ती ही वीट या विटेवर अखंडपणे उभा राहिला श्रीविठ्ठल, म्हणून इंद्राचा उद्धार झाला असा भावार्थ थरवर असे दिसते की सारी पुण्यकर्मे वा कर्मकांडे करायची ती स्वर्गप्राप्तीसाठी इंद्रपद मिळावे, ब्रह्मलोक, मोक्षपद याची प्राप्ती व्हावी, मुक्ती मिळावी, जन्ममरणाच्या फेऱ्या चुकाव्यात म्हणून सारा अट्टाहास असतो परंतु विठ्ठलभक्तीत रंगून गेलेल्या साधुसंतानी अगदी वेगळे असे स्वगुगस्थान शोधून काढले आहे त्यांना स्वर्गसुख नको, संपत्ती नको, ब्रह्मपद नको, मोक्षसुद्धा नको त्यांना हवे आहे केवळ श्रीविठ्ठलाचे सानिध्य श्रीविठ्ठल आपला प्राणसखा व आपण त्याचे जिवलग भक्त या नात्यातील गोडी त्यांनी अनुभवली असल्याने ब्रह्मादिख पदांची त्यांना 'शिराणी' वाटली, म्हणजे त्याची विटळ आली, अथवा परिणामी ती दुःखाची वाटली यात नवल काय? पंढरपूरच्या विठ्ठलाभोवती जो भागवत संप्रदाय उभा राहिला, जो वारकरी पंथ वाटचाल करू लागला त्याचे हे मोक्षसुखाच्या तुच्छतेवाचे एक मुख्य