भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 316, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 316

२८२ सार्थ तुकारामगाथा जिवंतचि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥ ३ ॥ संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥ ४ ॥ तळमळती यांच्या रांडा । घालितो जीवा नांवें धोंडा ॥ ५ ॥ तुका म्हणे बरे जाले । घे गे वाहिले लीहिले ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- लोंदा-गोळा, घास अर्थ :- काही धंदा न करिता आयता घास तोंडात पडेल तर बरे, असा विचार करणारा हा नवरा मला भेटला आहे १ उठल्या सुटल्या टाळ कुटीतच हा बसतो, याने सर्वत्र एकच गोगट करून सोडला आहे. २ हा जिवंत असून मेल्यासारखाच वाटतो सारी लाज याने घोळून प्यालेली दिसते ३ हा संसाराकडे चुकूनही लक्ष देत नाही त्यामुळे सारा संसार ओस पडला आहे ४ याच्या बायका घरी तळमळून रडतात व जीव धोंड्याप्रमाणे घट्ट करून दिवस काढीत आहेत ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे झाले ते बरे झाले. बाई, तुझ्या कपाळी होते तेच लिहिले असून त्याप्रमाणे घडते आहे. ६ ५७२ कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥ १ ॥ देवासाठीं जाले ब्रह्मांड सोइरे । कोमळया उत्तरें काय वेचे ॥ २ ॥ माने पाचारितां नव्हे आराणूक । ऐसे येती लोक प्रीतीसाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कातेलेसे श्वान लागे पाठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सोइरें-नातेवाईक, पाचारिता-बोलाविल्यावर, आराणूक-समाधान, सुख, कातेलेसे-संतापलेल्या अर्थ :- आपल्या पत्नीस उद्देशून बुवा म्हणतात, 'बाई, उगाच कोण आपल्या घरी येतील बरे ? काय ज्याचा त्याला धंदा घरचा नाही की काय ? १ या देवासाठी हे सारे जगातील लोक आपले नातेवाईकच बनले आहेत त्यांना कोमल शब्दात उत्तर दिलेस तर तुझे काय खर्च होईल ? २ मोठ्या सम्मानाने बोलाविले, तरी त्यात सुखसमाधान नसते; असे असूनही लोक मोठ्या प्रीतीने ईश्वरासाठी आपल्याकडे येतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या रांडेला यात काही भूषण वाटत नाही, ज्याच्या त्याच्या अंगावर संतापलेल्या कुत्र्यासारखी धावून जाते ४ विवरण - तुकारामबुवांच्या संसारासंबंधी, पत्नीसंबंधी, निरनिराळी मते प्रचलित आहेत वर जे सात अभंग आहेत, ते सुद्धा तुकोबांचे नसून त्यांमधे असाही काही अभ्यासकांचा ख्याल आहे तुकोबांची पत्नी जिजाबाई ही मोठी फटकळ, वात्रहाट व तुकारामांना सदोदित त्रास देणारी अशीही तिची रेखा कुणीकुणी रंगविली आहे ही जिजाबाई तुकोबांची दुसरी बायको हिचे माहेरचे नाव जाउली किंवा जिजाई असून ती पुण्याच्या किंवा भेंडच्या गुळवे घराण्यातील होती दोन्ही घराणी चांगली श्रीमंत व सावकाराची होती सर्व काही ठीक होते, तोपर्यंत प्रपंचही तुकारामबुवांचा बरोबर चालला असावा पण पुढे एकामागून एक अशी संकटपरंपरा बुवांच्यावर कोसळली आईबाप मेले, पहिली बायको मेली, पोरगे मेले, दावणीची गुरे मेली, दून मेले, दुष्काळ पडला, व्यापार संपून गावातील पत गेली दुकानाचे दिवाळे निघाले तुकारामबुवांची मनःस्थिती उसळून गेली खरी शांत वृत्तीने बुवांची पत्नी त्यांना सांभाळणारी, त्याचे मन समजावून घेणारी असती तर, कदाचित् वैराग्य कमी दिसले असता. पण ती कडक स्वभावाची होती श्रीमंतीत वाढलेली ही स्त्री बुवांचे मन बिनसत समजू करून होनी याबद्दल कित्येकांच्या मनात शंका आहे तुकोबांचे लक्ष प्रपंचांतून निघाले त्यांना साधा व्यवहारही उरला नाही घर सोडून भामनाथाच्या डोंगरावर जावे व विठ्ठलभजनात काळ कंठावा, नामस्मरण करावे, ज्ञानेश्वरीभागवताची पारायणे करावीत, यांत त्यांचे चित्त रमून गेले घरी पोरांचे काय होते, संसाराचे काय होते, घरी अन्नधान्याची गरज असते ना ? यासारख्या प्रश्नांची