भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 359, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 359

सार्थ तुकारामगाथा ३२५ वेद, अठरा पुराणे यांचे सारच होय. या रूपाच्या प्राप्तीमुळे दुष्टाचा स्पर्शसुद्धा आपणांस कधी होत नाही. विष्णू- सहस्रनाम व रामकृष्ण हरी हा मंत्र वारंवार जपत जा तू. २ अनुपानात दिल्याने जर चूक होत असेल, तरी मग त्यास भोजनही देऊ नये. असे केले तरच औषध घेतल्याचा गुण येईल हे सत्यच मानावे. ३ आत्मस्वरूपाच्या आपल्या घरातून कधीही बाहेर पडूच नये. बाहेरच्या विचारांचा जरा वारा लागेल असे कधी करू नये. वायफळ बडबड करण्यांचेही दूर सारावे. भलत्याची संगत करू नये. ४ आपल्यापाशी जे एक शुद्ध चित्त आहे तेच श्रीहरीस द्यावे. ते दिल्याने नवनीतच दिल्याचे श्रेय लाभेल व घुसळल्यानंतर असार असे ताक राहील. ते तू दूर सारून टाक. कारण त्याच्या आत काहीच तथ्य नसते. ५ पश्चात्तापाच्या किंवा वैराग्याच्या पाण्याने तू न्हाऊन नीघ. डोक्यावरून सर्व दिशा तू पांघरून घे. तुझ्या अंगातील आशारूपी घाम सारा निघू दे. मग तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे तू यापूर्वी जसा ब्रह्मस्थिती भावात होतास, तसाच परत होशील. त्यामुळे तुला वैराग्य चांगले प्राप्त होईल. ६ ६५१ मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी । हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥ १ ॥ लक्ष चौऱ्याशीं न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहुपुरा । वोळसा थोरा मायाजाळीं ॥ २ ॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरों अंध होती पांगुळ मुकीं ॥ ३ ॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देवचि म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरायें ॥ ४ ॥ क्षण एक मन स्थिर करुनी । सावध होई डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- मागुता-मानंतर, निधान-चांगले साधन अर्थ :- या जन्मात जी सुखदुःखे तू भोगली आहेस ती ध्यानात घेता, यानंतरही तुला माणसाचा जन्म येईल असे काही निश्चयाने घडेल असे नाही हे सर्व समजत असूनही तू याविषयी आंधळा का होतोस रे ? १ चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्या काही तुझ्या चुकायच्या नाहीत त्यावेळी गर्भवासातील थोर यातना तुला भोगा- वयास लागतील आणि चुकून माणसाच्या जन्मास आलास तर संदेहाच्या अवस्थेत सापडशील. या प्रपंचात देहादी वृत्तीचे संकट फार थोर आहे. २ तुझी अवस्था पशूसारखी होऊ देऊ नकोस पशू कधी पापपुण्याचा विचार तरी करतात का ? भोग भोगताना ते कधी उत्तम, मध्यम असा तरी विचार करतात का ? काही जन्म होताच मरतात, काही आंधळे होतात, काही पांगळे होतात, काही मुके होतात ३ तेव्हा नीट विचार कर. चांगले नरदेहासारखे साधन हाताशी आले आहे. हेच सर्व उत्तमाचे सार आहे उत्तमातील गती हीच आहे. याच मानवी देहाने मी देवच होणार असे म्हटले तर होण्यासारखे आहे तर मग या श्रीहरीस तू चित्तामध्ये का धारण करीत नाहीस ? ४ क्षणभर मन स्थिर करून मग सावध हो व डोळे उघडून पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, वेद, पुराणे काय काय बोलतात, हे तू नीट पाहा, अशी माझी तुला विनंती आहे. ५ ६५२ दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भाणें¹ टाकोनियां धांवे ॥ १ ॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्यें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ २ ॥ १ भाने.