भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 414, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 414

३७८ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- हे माझें देहू गाव धन्य असून मोठ्या पुण्याचे स्थान आहे. कारण या ठिकाणीं प्रत्यक्ष देवाची, पांडुरंगाची वसती कायमची आहे १ या क्षेत्रांतील लोकही धन्य व दैववान होत कारण त्याच्या मुखातून सारखा विठ्ठलाचा नामघोष होत असतो. २ या विश्वात जन्म देणाऱ्या विठ्ठलाचे हात त्याच्या कमरेवर असून तो उभा आहे त्याच्या डाव्या अंगास माता रखुमादेवी उभी आहे. ३ जवळच पारावर गरुड उभा असून त्याने हात जोडले आहेत. समोर उत्तरेस पिंपळाचा वृक्ष उभा आहे. ४ दक्षिण दिशेस हरेश्वर नावाचे शंकराचे लिंग असून या गावास असणारे इंद्रायणी नावाच्या नदीचे तीर शोभून दिसते ५ जवळच लक्ष्मीनारायणाचे व बल्लाळाचे वन असून तेथे सिद्धेश्व- राचे स्थान प्रसिद्ध आहे. ६ दारात विघ्न दूर करणाऱ्या गणपतीचे स्थान असून बाहेर ग्रामदेव बहिरोबा आहे हनुमंतही रक्षणार्थ शेजारीच आहे. ७ तुकाराम महाराज म्हणतात, याच गावात हा दास कीर्तन करीत असून हृदयाशी विठोबाचे चरण धरीत आहेत. ८ विवरण :- या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकारामबुवांनी आपल्या देहू या गावचे तपशीलवार असे वर्णन केले आहे तुकोबांच्या संगती पवित्र व प्रसिद्ध झालेल हे गाव पुण्यापासून जवळच बसलेले एक लहान खेडे आहे पुणे मुबंई रस्त्यावरच पंधराव्या मैलावर उत्तरेस जाणारा देहूचा रस्ता लागतो या रस्त्याने तीन मैलावर इंद्रायणी नदीच्या काठी हे देहू क्षेत्र बसले आहे हे क्षेत्र आळंदीपासून पाच कोस, तळेगावपासून चार कोस, चिंचवड- पासून तीन-चार कोस दूर असून याच्या सभोवती लहान लहान डोंगर आहेत ज्ञानेश्वराच्यामुळे आळंदी पंढरपूर याचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात झाले एकनाथामुळे पैठणचे नाव झाले रामदासामुळे सज्जनगड, चाफळ, जाय ही स्थाने उदयास आली आणि तुकोबांच्यामुळे देहूचे भाग्य उदयास येऊन अवघ्या महाराष्ट्रात त्याची कीर्ती पसरून राहिली या गावात तुकोबाच्या आधीही चारदोन लहानलहान मंदिरे नेहमीप्रमाणे होतीच बुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा यानी या गावी श्रीविठ्ठलरखुमाईचे मंदिर बाधले तेव्हापासून या घराण्याचा विठ्ठलाशी संबंध जडला गेला त्याच्या घरी पंढरीची वारीही प्रथमपासून होतीच या अभंगातील सर्व वर्णन ऐतिहासिक वस्तुस्थितीस धरून आहे विठ्ठलाच्या देवळाचा भाग व त्याचा विस्तार हा नंतरचा असला तरी विठ्ठलरखुमाईच्या मूर्ती मात्र विश्वंभरबुवांनी स्थापन केलेल्या आहेत याच मंदिराचा तुकोबांनी जीर्णोद्धार केला देहूम श्रीविठ्ठल व रखुमाई शेजारी शेजारी असून त्यांच्या मूर्ती उत्तरेस तोंड करून आहेत समोर गरुडपार आहे गरुडहनुमंत नेहमीप्रमाणे हात जोडून देवासमोर उभे आहेत पूर्वेकडील दरवाजावर दक्षिणेस तोंड असलेले विघ्नराज असून बाहेर बहिरोबांचे छोटे मंदिर आहे मंदिराच्या पश्चिमेस हरेश्वर मंदिर असून थोड्या अंतरावर तुकोबांचेही घर आहे पश्चिमेच्या बाजूस बल्लाळाचे वन असून या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या थोडे पूर्वेस लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे ही मंदिरे तुकोबांच्या आधीपासूनची आहेत देहूक्षेत्राला लागूनच इंद्रायणी नदी असून उत्तराभिमुख होऊन वहात आहे या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे सर्व स्थानांचे विशेष आजही मिळतात, पण तुकोबांच्या इतर अभंगातून ज्याचा उल्लेख आला आहे त्याची स्थानेही दृष्टीस पडतात अर्थात या स्थानांना तुकारामबुवाच्या नंतर महत्त्व येत राहिले मबाजीबुवांचे घर, त्याची वाव, प्रदक्षिणेचा रस्ता, पुंडलिकाचे देऊळ, वह्या उदकावर तरल्या तो डोह, गोपाळपूर, जुनाट पिंपरीचा वृक्ष, गरजाईच स्थान, मुरलीधराचे देऊळ, पहिल्या स्त्रीचे, रखुमाईचे वृंदावन, थोड्या दूर अंतरावर भामनाथचा डोंगर ही सर्व स्थाने नंतरच्या काळात विशेष रूपांनी प्रसिद्ध झाली

शाक्तावर-अभंग १३

७९० टंवकारूनि दृष्टी लावुनिया रंग । दावी झगमग डोळ्यापुढें ॥ १ ॥ म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकीचि उपाधी झकविती ॥ २ ॥ दीपाचिया ज्योती फोडियेलें तेज । उपदेश साजरात्रीमाजी ॥ ३ ॥