भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 430, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 430

३९२ सार्थ तुकारामगाथा विठ्ठलाचे हे एक ध्यान हृदयात स्थिर झाले म्हणजे, सर्व परिपूर्ण झाले असे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, गोजिरवाण्या दिसणाऱ्या विठोबा, मला तुमच्या पाया पडू द्यांत, ४ ८२९ आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तो आपणापें यत्न बरा ॥ १ ॥ दास्यत्वे दाखिले धन्याचें भांडार । तोतो नव्हे सार एथुनिया ॥ २ ॥ उपायाने सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आले ॥ ३ ॥ तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचनचि फरी बैसोनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दीपे-दिव्याने, सोस-इंद्रियसुखाची हौस अर्थ - कोणत्याही पदार्थांचा आदी, मध्य, अंत काळोखात दिव्यानेच स्पष्ट होतो त्यामुळे अशा या दिव्या- च्याच उपयोगाचा आश्रय करावा हे बरे १ दास्यत्वामुळेच धन्याचे भांडार दृष्टीत पडते ही वृत्ती जर अंगी बाणली नाही, तर मात्र ते भांडार दृष्टीस पडणार नाही २ या ईश्वराच्या प्रेमाच्या उपायाने इंद्रियसुखाची हौस सर्व संपली आणि या प्रभूच्या प्रेमाचीच सत्ता अंगी बाणून राहिली ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमची दृष्टी सर्वांच्यावर सारखी असते आणि बसल्याबसल्याच आम्ही सर्वांना आज्ञा करीत असतो ४ ८३० साटविले वाण । पैस घातला दुकान ॥ १ ॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥ २ ॥ निवडिले साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥ ३ ॥ तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाण-माल, पैस-ऐसपैस, मोठे अर्थ - भक्तीच्या नाना प्रकाराचा माल मी माझ्या दुकानात भरलेला आहे मी दुकान चांगले ऐसपैस घातले आहे १ जे कुणाला ज्या वेळी पाहिजे, ते त्याने सागावे सर्व काही जवळच येथे तयार आहे २ उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा प्रकाराचा खराखुरा माल निवडून आम्ही ठेविला आहे ३ तुकारामच या दुकानावर बसून जो ज्या भावाने, वृत्तीने मागणी करील त्याप्रमाणे तो मालाचा पुरवठा करीत आहे ४ विवरण - तुकारामबुवा धंद्याने वाणी होते हे प्रसिद्ध आहे व्यापार करावा, थोडी सावकारकीही करावी, दुकानदारी चालवावी, हा त्यांचा धंदा होता याच धंद्यात पुढे तूट आली, दुष्काळामुळे द्रव्य संपून गेले, दुकानाच दिवाळे निघाले, वैराग्यशील वृत्ती मूळचीच ती अधिक परमात्मप्रवण होऊन हरिभजनात दङ्ग झाली भामनाथाच्या डोंगरावर वृक्षवल्लीच्या सहवासात रममाण झाली ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व गीता याच्या पारायणांनी व नामस्मरणाच्या सतत संगतीने बुवांची वृत्ती उल्हसित व प्रसन्न झाली नामसंकीर्तन व भजन हा सोपा माग हाताशी आला. नामदेवाकडून कवित्वाची प्रेरणा झाली सद्गुरुनाथांनी कृपा केली तुकोबाच्या मुखातून प्रसादपूर्ण अशी अभंग वाणी स्रवू लागली त्याच्या अभंगवाणीत काव्यगुणांचे सर्वोत्तम दर्शन होत हे खरेच परंतु परमेश्वराशी प्रेमपूर्वक कलह करीत असताना, आपला मुद्दा स्पष्ट करताना एखादा सिद्धान्त सांगताना बुवा कधी उदाहरण म्हणून कधी रूपक म्हणून आपल्या धंद्याचा अथवा व्यवसायाचा उपयोग मोठ्या चातुर्याने व समर्पक रीतीने करतात 'फोडिले भांडार धन्याचा हा माल' ही प्रसिद्ध ओळ (क्र ६९६ ) आपण पाहिलीच आहे याखेरीज अनेक ओळीत तुकारामबुवा आपल्या व्यापाराच्या, दुकानदारीच्या व्यवसायाचा मोठ्या गमतीने पण समर्पक रीतीने उल्लेख करितात 'येथ हातीं येच हातों । वाधा गांठीं पारखून', 'उतरला कसीं खरा माल', 'सवंग जाले सवंग जाले । घरा आले बदरोचे', 'पंढरी चोहोटा घातले दुकान', 'नाम घ्यारे कोणी फुका । भाव सांगतसे तुका', 'उधार घ्यारे उधार घ्यारे । अवघे मारे जातीचे', 'दुबळा तुका मावहीन । उधार देय घेतला ऋण', 'माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही', 'मुद्दल