भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 429, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 429

सार्थ तुकारामगाथा ३९१ शब्दार्थ व टीपा :- आणिकांच्या-दुसऱ्याच्या, मेळवितां-भेटविल्यावर. अर्थ :- एखादे वासरु पुढे पळू लागले तर, त्याची आई (गाय) त्याच्यापाठीमागे धावत जाते कारण या वासराविषयीचा प्रेमभाव त्या गाईच्यामध्ये सहजच निर्माण झालेला असतो. १ असे हे प्रेम शिकवून कधी उपयोगास येईल काय ? मनातील गूढ प्रेमाचा तंतूच दुसऱ्याच्या मनास ओढीत असतो. २ पुढे वासरू मोठे झाले की गाय मग त्यास सोडून देते; मग पुनः तिला जरी ते बळेच भेटविले, तरी ती काही त्याला प्रेमपान्हा पाजीत नाही, उलट लाथा मारून ती त्याला दूरच करील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीचे प्रेम आग्रह करून निर्माण होत नाही. अगचा अनुभवच ते बोलून दाखवीत असते. ४ ८२६ देवाच्या संबंधें विश्वचि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥ १ ॥ आहाघ हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनौं देखें सामावलें ॥ २ ॥ आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरौँ तेणें न्यायें ॥ ३ ॥ तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभाचि पुढती विशेषेता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाघ-व्यर्थ, उगाच. अर्थ :- एकदा देवाचा संबंध आल्यावर मग सर्वच विश्वच आपले सोयरे बनून राहते आणि मग परस्परांच्या आंतरिक नात्याची सूत्रे एकमेकांना ओढीत राहतात. १ असे हे विश्वात्मक प्रेम उगाच वरवरचे व पटकन वीट येणारे नसते. या प्रेमात जीव स्वत चे जे जीवन परमेश्वरस्वरूप त्यात सामावून गेलेला असतो. २ या प्रेमाचे लक्षणच असे असते की, इतरांचे सुखदुःख याच्या अत करणात उमटते व याच न्यायाने याला एकाला झालेले दुख इतरत्र उमटून राहते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे शुद्ध स्वरूपाचा एकात्मभाव अंतःकरणात दृढ झालेला असल्यामुळे त्याची शोभा उत्तरोत्तर वाढीसच लागलेली असते. ४ ८२७ अवघा वेंचलौं इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥ १ ॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ २ ॥ कायावाचामनें तोचि निजध्यास । एथें जालों ओस भक्तिभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेचलों-खर्च झाले, धावणे-रक्षण. अर्थ :-देवा, या इंद्रियांच्याच ओढीमुळे माझे सर्व आयुष्य खर्च झाले. याविषयी जे ज्या ज्या वेळी घडले, ते ते सर्व मी तुम्हांस सांगितले आहे. १ देवा, आपल्याला हा विचार माहीत असावा म्हणून सांगून माझ्यावरचा भार मी कमी केला आहे. २ माझ्या शरीराने, वाणीने, मनाने विषयांचा ध्यास एकसारखा घेतल्यामुळे मी भक्ति- भावरहित होऊन बसलो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, नारायणा, तुम्हांस जर माझे रक्षण करावयाचे असेल तर, माझा सांभाळ आताच करावा. ४ ८२८ राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपटो ॥ १ ॥ फोडकंडुनि घरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ २ ॥ होईल येणें कळसा आलें । स्थिरावले अंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे गोजिरिया । विठोया पायां पडों द्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- लंपटो-जडून राहो, कळसा आलें-परिपूर्ण झाले. अर्थ :- आता श्रीविठ्ठलाचे हेच ध्यान माझ्यासमोर स्थिर व्हावे. यावरच माझे डोळे व मन जडून राहावेत. १ या पांडुरंगाला मी आता माझ्या हृदयात कोंडून ठेवीन व देहभावाच्या प्रेमाने मी याला ओवाळीन. २ याप्रमाणे