सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 469, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंविवरणः- स्वकर्म निष्काम झाल्यावर, स्वतः ईश्वरभेटीने तृप्त झाल्यावर, जीवशिवाच्या, आत्मा- परमात्म्याच्या ऐक्याची प्रचीती आल्यावर साधुसंत कशासाठी या जगांत वावरतात? या एका प्रश्नाचे स्पष्ट उत्तर तुकाराम महाराजांनी या एका महत्त्वाच्या अभंगात दिलेले आहे. सर्व जगत् हे एका बीजाचा विस्तार असल्याने व एकच आत्मतत्त्व सर्व भूतमात्रांत भरून असल्यामुळे, ब्रह्मभाव अथवा साक्षात्काराची भावना ही कधी एकाच व्यक्तींत सीमित होऊन राहात नाही. ती साऱ्या विश्वाला कवळण्यास सिद्ध होते. अज्ञानाने कष्टी बहुरी होणाऱ्या मानवांचे अश्रू पुसायला ती उत्सुक होते. ज्ञानेश्वरांपासून तुकारामरामदासांपर्यंत सर्व संतांनी आपल्या या कार्याने ॰॰ नष्ट केले आहे. धर्माच्या पालनासाठी व पाखांडखंडनासाठी आपण हातात शब्दाचे तीक्ष्ण बाण धरून हिंडत आहोत, असे तुकोबांनी एका अभंगात म्हटले आहे. जे रंजले-गांजलेले आहेत, त्यांना जवळ करणे हाच साधुसंतांच्या देवत्वाचा मुख्य धर्म आहे, असेही तुकारामबुवा सांगतात. अशा या दुःखी, कष्टी लोकांचा कळवळा या माणुसकांना मोठाच असतो. सर्व भूतमात्रांत पसरून राहिलेला ईश्वरी अंश दुःखित झालेला त्यांना पाहावत नाही. ‘चित्तेनें कर फाटतो’ या शब्दांत अस्ताव्यस्त झालेल्या समाजाच्या दुःखाचे स्वरूप रामदासांनी व्यक्त केले आहे.
९४९ आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥ १ ॥ होईं बा जागा होईं बा जागा । वाउगा कां गा सिणसीस ॥ २ ॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसिन ना ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपाव-उपाय, येर-दुसरा, वाव-व्यर्थ, जाणिवेच्या-ज्ञानाच्या
अर्थ :- ज्यामुळे ईश्वराची आठवण होईल, तो उपाय आपण करावा. इतर सर्व व्यर्थ असणारा खटाटोप टाकून द्यावा. १ अरे बाबा, माणसा, तू नीट जागे व्हावेस. उगाच का शिणतोस ? कष्टी होतोस ? २ ज्ञानाच्या व्यर्थ ओझ्याने तू या संसारसागरात बुडशील मात्र; मग त्यातून सुखरूपपणे बाहेर पडणे, कधी होणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू एका भावभक्तीच्या बळावरच ईश्वरास प्राप्त करून घेशील. केवळ ज्ञानाने तुला सर्व काही समजेल असे नाही. ४
९५० माझ्या मुखावाटा नयो¹ हें वचन । व्हावें हें संतान द्रव्य कोणां ॥ १ ॥ फुBuffer/फुकाचा² विभाग पतनदुःखासी । दोहोंमुळे त्यासी तेंचि साधे³ ॥ २ ॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानीं । सादर या मनीं होऊनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे देव असाध्य यामुळे । आशामोहाजाळें गुंतलिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- संतान-मूलबाळ.
अर्थ :- कुणाला मूलबाळ व्हावे, कुणाला संतती प्राप्त व्हावी, असे शब्द माझ्या मुखावाटे कधी निघू नयेत. १ कारण या दोन गोष्टींमुळे फुकट दुःखाचा व पतनाचा वाटा मात्र प्राप्त होतो. २ माझ्या कानांनी कुणाची निंदा- स्तुती ऐकू नये व मनाने या मार्गास, म्हणजे निंदास्तुतीच्या मार्गास कधीही लागू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आशा व नाना मोह यांच्या जाळघांत सापडल्यानंतर देव मात्र अप्राप्य होतो. ४
९५१ चित्त ग्वाही तेथे लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥ १ ॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक⁴ हा देव अंतर्वाही ॥ २ ॥ शुद्ध भावा न लगे सुचाया परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥ ३ ॥ भोगित्यासी काज अंतरींचें गोड । बाहिरल्या घाड नाहीं रंगें ॥ ४ ॥ तुका म्हणे भाव शुध्द हें कारण । भेटे नारायण होईल त्यांचा ॥ ५ ॥
१ नये, २ सुखाचा, ३ साध्य, ४ व्यापला.