भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 473, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 473

सार्थ तुकारामगाथा ४३३ ९५५ निर्गुणाचे द्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥ १ ॥ तुम्हां आम्हा आता न पडे यावरी । आहों तेंचि बरी जेथें तेथें ॥ २ ॥ आपणापासुनी नसावे अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही अर्थ - या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्यामुळे परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनांनी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या- प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४ ९५६ तुजच पासाय जालोसो निर्माण । असावे तें भिन्न कासयाने ॥ १ ॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करुनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां बोलतसे स्पष्ट । जालो क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पासाय-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलेले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे करुन अकर्ता बनलो आहे ४ विवरण - एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व सचराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुखपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी त्यासच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व सृष्टीचा चराचर संसार आकारास आला एकाच अव्यक्तातपासून हे सर्व गुणरूपधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे "अव्यक्त प्रकृती हे याचे बीज बुद्धी हे खोड, अहंकार हा मुख्य पल्लव मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोल्या, पंचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलानी व शुभाशुभ फलानी नेहमी समृद्ध असतो सर्व प्राणिमात्रांना आधारभूत होतो' असे याचे वर्णन आढळते ऋग्वेदादी ग्रंथापासून या प्रक्रियेचे वर्णन करताना या मूलभूत वीजा- तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतरूप वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे व गीता यातील अश्वत्थ वृक्ष हाय. परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव यात हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतांनी मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा रित्या वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहात, पापी आहोत, संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहात व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा सारखा ध्यास सर्वांना असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवने ? हे पाप आले कोठून ? दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही मातले घातलेले दिसतात संत चोखामेळानी विटाळाचे अभंग लिहिले आहेत त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर देवा, तुझीही प्रवृत्ती तपासावयास हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत बीजातील सर्व तु गाथा .५५